शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यांवर खड्डे नव्हे तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देनागरिक मेटाकुटीला : एकही रस्ता खड्डेमुक्त नाही, खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याने अपघाताची भीती कायम

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात झालेल्या अतिवृष्टीने नगरपरिषदेच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले असून शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तर एवढे मोठे खड्डे पडले आहे की, त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पावसामुळे या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांसोबत नागरिकही चांगलेच मेटाकुटीला आले आहे.भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. एक खड्डा चुकवला की दुसऱ्या खड्ड्यात वाहन जात असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक हा होय. या रस्त्यावर जिल्हा बँकेच्या जवळ साधारणत: चार फुट रुंद खड्डा पडला आहे. रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे वाहन उसळत आहेत. मुस्लिम लायब्ररी ते कॉलेज मार्गावर रस्ता नावालाच उरला आहे. या मार्गावरून विद्यार्थ्यांसह अर्ध्या शहरातील नागरिक जाणे येणे करतात. परंतु डागडुजीकडे अद्यापही कुणाचे लक्ष नाही.त्रिमूर्ती चौक ते बसस्थानक या रस्त्यावरही मोठाले खड्डे पडले आहेत. वाहनांची येथे सतत वर्दळ असते. पहिल्या दिवशी लहान असलेला खड्डा दुसºया दिवशी मोठा झालेला दिसतो. शास्त्री चौक ते खांबतलाव चौक मार्गावरील रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. राजीव गांधी चौक परिसरात रस्ता निर्माणाधिन असून या भागात मोठाले खड्डे पडलेले आहेत. शहरातील सामाजिक न्याय भवनापासून शासकीय वसाहत मार्गे बसस्थानकाकडे जाणारा रस्ता तर अक्षरश: तलावाचे स्वरुप घेऊन आहे. मातीने माखलेल्या या रस्त्यावरून जाताना कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किसान चौक ते देशबंधू वॉर्डाकडे जाणाºया रस्त्यावर तलावच दिसत आहे. पावसाचे पाणी यात साचून राहते. जिल्हा परिषद चौक ते गणेशपूर रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. नवीन वसाहतीतील रस्त्याबाबत तर विचारायचीही सोय नाही. अनेक वाहनधारक आपली वाहने बाहेर दूर ठेवून चिखल तुडवत घरी जाताना दिसतात. नगरपरिषदेने या रस्त्यांची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी आहे.रस्त्यांची डागडुजी केव्हा?शहरातील प्रमुख मार्ग खड्ड्यांनी व्यापले आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती केव्हा केली जाणार असा साधा सरळ प्रश्न नागरिक करीत आहेत. नगरपरिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्याप नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी खड्ड्यांमध्ये तात्पुरता का होईना मुरुमाचा भराव तरी टाकावा अशी मागणी होत आहे.गणेश उत्सवातही डागडुजीकडे दुर्लक्षशहरात गणेश स्थापनेपासून गणेश विसर्जनापर्यंत दहा दिवस उत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती. बाप्पांचे आगमन खड्डेमय रस्त्यावरून झाले आणि विसर्जन मिरवणुकही खड्डेयुक्त रस्त्यावरूनच काढावी लागली. गणेशोत्सवाच्या काळात नगरपरिषद या रस्त्यांची डागडुजी करेल अशी अपेक्षा होती, मात्र नगरपरिषदेने उत्सवाच्या काळातही डागडुजीकडे दुर्लक्ष केले. सतत पाऊस पडत असल्याने डागडुजीत अडथळा आल्याचे नगरपरिषद आता सांगत आहे. परिणामी रस्त्यांवर खड्डे आहेत.बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्यजिल्हा मुख्यालय असलेल्या बसस्थानकालाही खड्ड्यांनी सोडले नाही. बसस्थानकाच्या आवारात पाच ते सात फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. सतत पाऊस पडत असल्याने या खड्ड्यात पाणी साचते. भरधाव बस आली की खड्ड्यांतील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे बाहेरगावी जाणाºया नागरिकांची कोंडी होते. बसस्थानकात दररोज शंभरावर बससेचे आवागमन होते. शहरासह जिल्हाभरातील नागरिक येथे बाहेरगावी जाण्यासाठी येतात. मात्र येथील खड्ड्यांनी मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक