शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: September 30, 2015 00:46 IST

शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

भंडारा बंदचे आवाहन : दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मंडळाची मागणी, पाठीवर व्रण येईस्तोवर तरुणांना बदडलेभंडारा : शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारला दुपारी १ वाजता पोलीस ठाण्याला घेराव करुन दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली.भंडारा बंदचा इशारातत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध केला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बुधवारला भंडारा शहर बंदचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले, मंगळवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बजरंग गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघाली. मिरवणूक महालाजवळ आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे संकटमोचक मंदिरात हनुमंताच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसाचे पठण सुरु असतानाच काही पोलिसांनी तरुणांना धमकविणे सुरु केले. पोलिसांकडून बेदम मारहाणकाही कळायच्या आतच पोलिसांनी कार्यकर्त्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा लाठीमार का केला जात आहे, हे विचारण्यासाठी काही ज्येष्ठ कार्यकर्ते गेले असता त्यांच्यावरही लाठीमार करण्यात आला. कार्यकर्ते जिवाच्या आकांताने जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून पकडून बदडले. या लाठीहल्ल्यात दश माटूरकर, हर्षल कुंभारे, चेतन पाटील, वैभव बांते, हरीष हुकरे, प्रणय कुथे, संकेत मते, शुभम माटूरकर, मिलिंद डुंभरे, बंटी अले, जय पटेल या तरुणांच्या पाठीवर लाठीचे बेदम व्रण आहेत. याशिवाय उषा सरसाळे, सुमन डुंभरे, आरजु करंडे, तुलसी पटेल या महिलांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली.यावेळी गणवेशात नसलेल्या पोलिसांनी बँडपथकातील तरुणांनाही बदडून वाद्य हिसकावून घेतले. पोलीस एवढ्यावरच न थांबता घरात शिरुन मारहाण केली. पोलिसांनीच कार्यकर्त्यांना सूचना न देता गणपती मूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे ही पोलिसांची सुनियोजित प्रयत्न होता, असा आरोपही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करुन न्याय देण्याची मागणी महिला व पुरुषांनी केली.संघटनांनी नोंदविला निषेधबजरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारच्या घटनेचा भंडारा जिल्हा विकास मंचचे जिल्हाध्यक्ष आबिद सिद्धीकी यांनी निषेध नोंदविला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अनंत चतुर्दशीला विसर्जनाची गरजराज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करण्याची पद्धत आहे. मात्र भंडारा या एकमेव जिल्ह्यात तिथी गेल्यानंतर पितृपक्षात विसर्जन करण्याचा पायंडा आहे. महानगराच्या तुलनेत या जिल्ह्यात सार्वजनिक गणपती कमी आहेत. असे असताना एकाच दिवशी विसर्जन पद्धत असती तर कदाचित ही वेळ आली नसती. त्यामुळे प्रशासनासह गणपती मंडळांनीही पुढच्या वर्षीपासून अनंत चतुर्दशीलाच विसर्जन करण्याची परंपरा जपली पाहिजे.