शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जगताहेत तणावात

By admin | Updated: July 25, 2015 01:23 IST

पोलीसही शेवटी माणूसच आहे. मात्र त्याला २४ तास सेवा बजवावी लागते.

सिराज शेख  मोहाडीपोलीसही शेवटी माणूसच आहे. मात्र त्याला २४ तास सेवा बजवावी लागते. सेवा बजावताना विश्रांतीच मिळत नसल्याने पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागतो. यातूनच त्यांना एक ना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. मात्र गृह विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.जून-जुलैपासून सतत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पत संस्था, अर्बन बँक यांची निवडणूक संपली. आता ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. पुढे बाजार समिती व नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे कार्य पोलिसांना सांभाळावे लागतात. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान व विजयी मिरवणुकीपर्यंत पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागते. नेत्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तात या पोलिसांना तासन्तास रस्त्यावर, चौकात उभे राहावे लागते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव पातळीवरील गटबाजी, तणाव शांत राहूण सोडवावी लागते. लागोपाठ कर्तव्य बजावत असल्याने या पोलिसांना परिवारासाठी द्यायला वेळ नाही. या प्रकारामुळे पोलिसांवर शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो. तरी पोलीस आपले कर्तव्य मुकपणे पार पाडीत असतात. मात्र, एखाद्या घटनेत जनतेकडून पोलिसानांच टार्गेट केले जाते. खरे तर नागरिकांनीसुध्दा पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. मोठ्या निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्त वातावरण तापत असते. त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण पडत असतो. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस शिपायांच्या आरोग्याची काळाजी घेणे गरजेचे आहे. तसेच शासनानेसुध्दा अन्य दलाकडून निवडणुकीची कामे करवून घेतली तर सततच्या निवडणूक बंदोबस्तातून पोलिसांची सुटका होऊन नियमित कर्तव्यावर काम करण्याचा त्यांना वेळ मिळेल व जनताही सुरक्षित राहू शकेल.