शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

पोलीस जगताहेत तणावात

By admin | Updated: July 25, 2015 01:23 IST

पोलीसही शेवटी माणूसच आहे. मात्र त्याला २४ तास सेवा बजवावी लागते.

सिराज शेख  मोहाडीपोलीसही शेवटी माणूसच आहे. मात्र त्याला २४ तास सेवा बजवावी लागते. सेवा बजावताना विश्रांतीच मिळत नसल्याने पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागतो. यातूनच त्यांना एक ना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. मात्र गृह विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.जून-जुलैपासून सतत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पत संस्था, अर्बन बँक यांची निवडणूक संपली. आता ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. पुढे बाजार समिती व नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे कार्य पोलिसांना सांभाळावे लागतात. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान व विजयी मिरवणुकीपर्यंत पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागते. नेत्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तात या पोलिसांना तासन्तास रस्त्यावर, चौकात उभे राहावे लागते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव पातळीवरील गटबाजी, तणाव शांत राहूण सोडवावी लागते. लागोपाठ कर्तव्य बजावत असल्याने या पोलिसांना परिवारासाठी द्यायला वेळ नाही. या प्रकारामुळे पोलिसांवर शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो. तरी पोलीस आपले कर्तव्य मुकपणे पार पाडीत असतात. मात्र, एखाद्या घटनेत जनतेकडून पोलिसानांच टार्गेट केले जाते. खरे तर नागरिकांनीसुध्दा पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. मोठ्या निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्त वातावरण तापत असते. त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण पडत असतो. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस शिपायांच्या आरोग्याची काळाजी घेणे गरजेचे आहे. तसेच शासनानेसुध्दा अन्य दलाकडून निवडणुकीची कामे करवून घेतली तर सततच्या निवडणूक बंदोबस्तातून पोलिसांची सुटका होऊन नियमित कर्तव्यावर काम करण्याचा त्यांना वेळ मिळेल व जनताही सुरक्षित राहू शकेल.