शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अपघातानंतरही खड्डे बुजविण्यात आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

साकोली ते भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर साकोलीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील जांभळी ते मुंडीपार हा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला ...

साकोली ते भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर साकोलीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील जांभळी ते मुंडीपार हा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरवर्षीच्या पावसाळ्यात या महामार्गावर मोठमोठाले खड्डे पडतात व अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. शासन दरबारी नोंदीनुसार तीन वर्षांत आठ जणांचे प्राण या खड्ड्यांमुळे गेलेले आहेत, तर १५ जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच प्रा.बहेकार यांचे अपघाती निधन झाले. यावेळी नागरिकांचा रोज रोष हायवे विभागावर होता. अनेक सामाजिक संघटनांनी यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या. पोलीस विभागाने तर संबंधित विभागाला पत्र पाठवून तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, दोन दिवस उलटूनही अजूनपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष व पडलेले खड्डे हे किती धोकादायक आहेत, याची कल्पनाच न केलेली बरी. संबंधित विभागाने तत्काळ खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रामू लांजेवार यांनी केली आहे. दोन दिवसांत खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर संबंधित विभागासमोर आंदोलनाचा इशाराही लांजेवार यांनी दिला आहे.