शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुक्यातील भागडी हे चार हजार लोकसंख्येचे गाव. चुलबंद नदीच्या तिरावर नळयोजनेची विहिर आहे. येथूनच पाईपलाईनद्वारे पाणी आणून नळाद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नळातून येणारे पाणी गढूळ आणि दूषित असल्याच्या गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. पिण्यासह इतर कामासाठी पाण्याचा वापर केल्यानंतर काही गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटली.

ठळक मुद्दे भागडीवासीयांचे हाल : नळयोजनेला दूषित पाणीपुरवठ्याने आजारात वाढ

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भर पावसाळ्यात चिखल तुडवत पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील महिलांसह वृद्ध आणि चिमुकल्यांवर आली आहे. नळ योजनेचे पाणी गढूळ येत असून गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटत असल्याने आता एक किलोमीटर अंतरावरील एका शेतातून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवित आहेत.लाखांदूर तालुक्यातील भागडी हे चार हजार लोकसंख्येचे गाव. चुलबंद नदीच्या तिरावर नळयोजनेची विहिर आहे. येथूनच पाईपलाईनद्वारे पाणी आणून नळाद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नळातून येणारे पाणी गढूळ आणि दूषित असल्याच्या गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. पिण्यासह इतर कामासाठी पाण्याचा वापर केल्यानंतर काही गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटली. त्यामुळे गावकऱ्यांनी नळयोजनेचे पाणी पिणे आणि वापरणे बंद केले. आता पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरील एका शेतातील कृषीपंपाचा आधार घेतला जात आहे. महिलांसोबतच वृद्ध, चिमुकलेही पाणी आणण्यासाठी धडपडत आहेत. सध्या लाखांदूर तालुक्यात जोरदार पाऊस बरसत असून यामुळे शेतापर्यंतचा रस्ता पूर्ण चिखलाने माखलेला आहे. या चिखलमय रस्त्यावरून पाणी आणताना वयोवृद्धांना मोठी कसरत करावी लागते.गत पाच वर्षापासून पावसाळा आला की, भागडीवासीयांना या समस्येला तोंड द्यावे लागते. शुद्धीकरण यंत्रणा नसल्याने चुलबंद नदीचे पाणी थेट नळाद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहचते. गावात एक खासगी आरो प्लांट आहे. काही जण पाणी विकतही घेतात. परंतु गोरगरीबांना पाणी विकत घेणे शक्य नसल्याने त्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नसतो.या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला माहिती दिली. परंतु अद्यापही यावर कोणत्याच उपाययोजना झाल्या नाहीत. यंदा तर या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजाराची लागण होण्याची भीती आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात दूषित पाण्यामुळे गावकरी धास्तावले आहेत.आजाराची लागणनळयोजनेचे पाणी वापरल्याने अनेकांच्या अंगाला खाज सुटली तर काहींना इतर आजारही झाल्याची माहिती आहे. नळयोजनेच्या विहिरीचे जलस्त्रोत बंद पडल्याने या विहिरीत पावसाळ्यात साठलेल्या पुराचे पाणी थेट गावकºयांना पुरविले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे दूषित व गढूळ पाणी आंघोळ व कपडे धुण्यासाठी वापरले जाते. परंतु या पाण्याने काही नागरिकांच्या अंगाला खाज सुटल्याचे सांगण्यात आले. या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता गावकरी आता एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणत आहेत. परंतु प्रशासनाने सध्या तरी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने गावकºयांची पायपीट सुरु आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात