शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

फूट ब्रिजअभावी नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज ...

वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज होणार असल्याच्या राजकीय गर्जना वल्गना ठरल्या. फूट ब्रिजअभावी नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. रेल्वे रुळ ओलांडताना जीवाचा धोका तर आहेच याव्यतिरिक्त रेल्वे पोलिसांनी पकडल्यास आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासाची पुरवणी सोबतीला मिळते. फूट ब्रिज नसल्याने नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. फूट ब्रिजसाठी नागरिकात कमालीचा असंतोष आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानक समस्यांचे माहेरघर आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे उदासीन असून त्यांना विकास म्हणजे फक्त रस्ते-नाल्या पलीकडे समजत नसल्याचे दिसते. विकास कामे करायची नाही आणि दुसऱ्याला करू द्यायची नाही अशी राजकीय अवस्था आहे. यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. दूरदृष्टीचा अभाव असल्याने जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असूनही उपेक्षित आहे. दोन दशकापासून गावात एकहाती सत्ता आहे. पण विकासाच्या नावावर कामगिरी शून्य असे चित्र आहे. फूट ब्रिज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत आहे.

रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन समांतर भागात विभाजन झाले आहे. दोन्ही भागात समांतर वस्ती असल्याने नागरिकांना एका बाजूने दुसरीकडे ये-जा करावी लागते. गत दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. दोन्ही भागात व्यापार पेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय व खासगी रुग्णालय यासह लोकवस्ती आहे. वरठी हे केंद्रीय गाव असल्याने परिसरातील अनेक गावाचा सरळ संबंध वरठीशी येतो. त्यामुळे या गावाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

बॉक्स

रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी

नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकमात्र रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्याने बहुतांश वेळा रेल्वे फाटक बंद राहते. वर्दळीच्या काळात ही फाटक बंद असल्याने नागरिकांना नियम तोडून रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करावी लागते. रेल्वे रूळ वळणाने गुन्हा असल्याने त्यांना याचा फटका बसतो. घाईगडबडीत फाटक क्रॉस करताना नकळत अपघात सारख्या घटनांना सामोरे जावे लागते. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने तासनतास नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. रेल्वे फाटक डोकेदुखी ठरली आहे.

बॉक्स

रेल्वे पोलिसांची धरपकड

रेल्वे रुळ ओलांडणे व विना तिकीट रेल्वे परिसरात जाणे नियमानुसार गुन्हा आहे. पर्याय नसल्याने नियम डावलून जाण्याशिवाय पर्याय नाही. रेल्वे फाटकासमोर नेहमी गर्दी राहते. या गर्दीचा फायदा रेल्वे पोलिसांना होतो. पादचारी रेल्वे फाटक क्रॉस करून निघण्याचा प्रयत्न करताना दबा धरून असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्यांना ताब्यात घेतात व आर्थिक दंडाची वसुली करतात. अनेकदा नागरिकांना दिवसभर ताटकळत बसवून ठेवण्यात येत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रस्ताव धूळखात

फूट ब्रिजबाबत रेल्वे विभागाची संपूर्ण कारवाई पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांनी दिली. रेल्वे फाटकावर ब्रिज तयार करण्याचे नियोजन अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे. सुरुवातीला फूट ब्रिजचे आकारावरून नियोजन रखडले होते . पण सदर प्रकरण निवळले असून राज्य शासनाच्या दफ्तारी फूट ब्रिजचे प्रस्ताव धूळखात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविडचे कारण पुढे करून प्रकरण पेंडिंग असल्याची माहिती मिळाली आहे.