शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

फूट ब्रिजअभावी नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज ...

वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज होणार असल्याच्या राजकीय गर्जना वल्गना ठरल्या. फूट ब्रिजअभावी नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. रेल्वे रुळ ओलांडताना जीवाचा धोका तर आहेच याव्यतिरिक्त रेल्वे पोलिसांनी पकडल्यास आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासाची पुरवणी सोबतीला मिळते. फूट ब्रिज नसल्याने नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. फूट ब्रिजसाठी नागरिकात कमालीचा असंतोष आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानक समस्यांचे माहेरघर आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे उदासीन असून त्यांना विकास म्हणजे फक्त रस्ते-नाल्या पलीकडे समजत नसल्याचे दिसते. विकास कामे करायची नाही आणि दुसऱ्याला करू द्यायची नाही अशी राजकीय अवस्था आहे. यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. दूरदृष्टीचा अभाव असल्याने जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असूनही उपेक्षित आहे. दोन दशकापासून गावात एकहाती सत्ता आहे. पण विकासाच्या नावावर कामगिरी शून्य असे चित्र आहे. फूट ब्रिज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत आहे.

रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन समांतर भागात विभाजन झाले आहे. दोन्ही भागात समांतर वस्ती असल्याने नागरिकांना एका बाजूने दुसरीकडे ये-जा करावी लागते. गत दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. दोन्ही भागात व्यापार पेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय व खासगी रुग्णालय यासह लोकवस्ती आहे. वरठी हे केंद्रीय गाव असल्याने परिसरातील अनेक गावाचा सरळ संबंध वरठीशी येतो. त्यामुळे या गावाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

बॉक्स

रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी

नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकमात्र रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्याने बहुतांश वेळा रेल्वे फाटक बंद राहते. वर्दळीच्या काळात ही फाटक बंद असल्याने नागरिकांना नियम तोडून रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करावी लागते. रेल्वे रूळ वळणाने गुन्हा असल्याने त्यांना याचा फटका बसतो. घाईगडबडीत फाटक क्रॉस करताना नकळत अपघात सारख्या घटनांना सामोरे जावे लागते. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने तासनतास नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. रेल्वे फाटक डोकेदुखी ठरली आहे.

बॉक्स

रेल्वे पोलिसांची धरपकड

रेल्वे रुळ ओलांडणे व विना तिकीट रेल्वे परिसरात जाणे नियमानुसार गुन्हा आहे. पर्याय नसल्याने नियम डावलून जाण्याशिवाय पर्याय नाही. रेल्वे फाटकासमोर नेहमी गर्दी राहते. या गर्दीचा फायदा रेल्वे पोलिसांना होतो. पादचारी रेल्वे फाटक क्रॉस करून निघण्याचा प्रयत्न करताना दबा धरून असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्यांना ताब्यात घेतात व आर्थिक दंडाची वसुली करतात. अनेकदा नागरिकांना दिवसभर ताटकळत बसवून ठेवण्यात येत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रस्ताव धूळखात

फूट ब्रिजबाबत रेल्वे विभागाची संपूर्ण कारवाई पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांनी दिली. रेल्वे फाटकावर ब्रिज तयार करण्याचे नियोजन अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे. सुरुवातीला फूट ब्रिजचे आकारावरून नियोजन रखडले होते . पण सदर प्रकरण निवळले असून राज्य शासनाच्या दफ्तारी फूट ब्रिजचे प्रस्ताव धूळखात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविडचे कारण पुढे करून प्रकरण पेंडिंग असल्याची माहिती मिळाली आहे.