शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

फूट ब्रिजअभावी नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज ...

वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज होणार असल्याच्या राजकीय गर्जना वल्गना ठरल्या. फूट ब्रिजअभावी नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. रेल्वे रुळ ओलांडताना जीवाचा धोका तर आहेच याव्यतिरिक्त रेल्वे पोलिसांनी पकडल्यास आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासाची पुरवणी सोबतीला मिळते. फूट ब्रिज नसल्याने नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. फूट ब्रिजसाठी नागरिकात कमालीचा असंतोष आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानक समस्यांचे माहेरघर आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे उदासीन असून त्यांना विकास म्हणजे फक्त रस्ते-नाल्या पलीकडे समजत नसल्याचे दिसते. विकास कामे करायची नाही आणि दुसऱ्याला करू द्यायची नाही अशी राजकीय अवस्था आहे. यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. दूरदृष्टीचा अभाव असल्याने जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असूनही उपेक्षित आहे. दोन दशकापासून गावात एकहाती सत्ता आहे. पण विकासाच्या नावावर कामगिरी शून्य असे चित्र आहे. फूट ब्रिज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत आहे.

रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन समांतर भागात विभाजन झाले आहे. दोन्ही भागात समांतर वस्ती असल्याने नागरिकांना एका बाजूने दुसरीकडे ये-जा करावी लागते. गत दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. दोन्ही भागात व्यापार पेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय व खासगी रुग्णालय यासह लोकवस्ती आहे. वरठी हे केंद्रीय गाव असल्याने परिसरातील अनेक गावाचा सरळ संबंध वरठीशी येतो. त्यामुळे या गावाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

बॉक्स

रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी

नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकमात्र रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्याने बहुतांश वेळा रेल्वे फाटक बंद राहते. वर्दळीच्या काळात ही फाटक बंद असल्याने नागरिकांना नियम तोडून रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करावी लागते. रेल्वे रूळ वळणाने गुन्हा असल्याने त्यांना याचा फटका बसतो. घाईगडबडीत फाटक क्रॉस करताना नकळत अपघात सारख्या घटनांना सामोरे जावे लागते. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने तासनतास नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. रेल्वे फाटक डोकेदुखी ठरली आहे.

बॉक्स

रेल्वे पोलिसांची धरपकड

रेल्वे रुळ ओलांडणे व विना तिकीट रेल्वे परिसरात जाणे नियमानुसार गुन्हा आहे. पर्याय नसल्याने नियम डावलून जाण्याशिवाय पर्याय नाही. रेल्वे फाटकासमोर नेहमी गर्दी राहते. या गर्दीचा फायदा रेल्वे पोलिसांना होतो. पादचारी रेल्वे फाटक क्रॉस करून निघण्याचा प्रयत्न करताना दबा धरून असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्यांना ताब्यात घेतात व आर्थिक दंडाची वसुली करतात. अनेकदा नागरिकांना दिवसभर ताटकळत बसवून ठेवण्यात येत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रस्ताव धूळखात

फूट ब्रिजबाबत रेल्वे विभागाची संपूर्ण कारवाई पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांनी दिली. रेल्वे फाटकावर ब्रिज तयार करण्याचे नियोजन अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे. सुरुवातीला फूट ब्रिजचे आकारावरून नियोजन रखडले होते . पण सदर प्रकरण निवळले असून राज्य शासनाच्या दफ्तारी फूट ब्रिजचे प्रस्ताव धूळखात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविडचे कारण पुढे करून प्रकरण पेंडिंग असल्याची माहिती मिळाली आहे.