शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आर्थिक विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 01:06 IST

आर्थिक विकास साधायचा असेल तर आर्थिक मजबुती मिळवून देणाऱ्या संस्थानच्या किंवा बँकांच्या आर्थिक विकासात

भंडारा : आर्थिक विकास साधायचा असेल तर आर्थिक मजबुती मिळवून देणाऱ्या संस्थानच्या किंवा बँकांच्या आर्थिक विकासात नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे अध्यक्ष डॉ. एम.एल. सुखदेवे यांनी केले. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट व सामान्य नागरिकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि भंडारा सेंट्रल को आॅपरेटिव्ह बँकेच्या वतीने आज गुरूवारी बँकेच्या मुख्य शाखेत रूपे किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अनावरण, आर्थिक साक्षरता केंद्र व एटीएम केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी सुखदेवे बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, रिझर्व्ह बँकेच्या योगिता खोब्रागडे, नाबार्डचे ललीत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अरविंद खापर्डे, जिल्हा उपनिबंधक संजय क्षीरसागर, अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे उपस्थित होते.एम.एल. सुखदेवे म्हणाले, पुर्वी जी आर्थिक परिस्थिती होती ती आजही पहावयास मिळते. आर्थिक घडामोडींचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी स्थिती दिसून येते. नाबार्ड व रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी विकासाबाबत चर्चा होत असतात. अशावेळी नागपूर, मुंबई, पुणे या महानगरांची आर्थिक स्थिती आणि भंडाराची आर्थिक स्थिती यात बरेच अंतर आहे. भंडारा जिल्ह्यात पाणी आहे पण त्यावर आधारित उद्योग नाहीत. उद्योग उभे राहिले तर आर्थिक विकास आपोआप होतो. शेतकरी महिला बचत गट यांनी साधनांचा उपयोग करून व्यवसाय करावा व त्यातून आर्थिक पाया मजबूत करावा, असे आवाहनही सुखदेवे यांनी केले.बँकेच्या मुख्य शाखेत रूपे किसान क्रेडीट कार्ड योजनेचे अनावरण, आर्थिक साक्षरता केंद्र व एटीएम केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे प्रास्ताविकात म्हणाले, महाराष्ट्र राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांकडे नाबार्ड व रिझर्व बँकेकडे मागण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. यात ग्रामीण स्तरावरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण, नाबार्ड व राज्य बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर एकसमान ठेवणे आदी मागण्यांचा समावेश आहे. राज्यात भंडारा जिल्ह्यालाच सहा आर्थिक साक्षरता केंद्र मिळाले हे या बँकेचे मोठे यश असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, नाबार्डचे ललीत जाधव यांनीही मार्गदर्शन केले. संचालन डॉ.प्रकाश मालगावे यांनी तर आभारप्रदर्शन बँकेचे संचालक प्रेमसागर गणवीर यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रामलाल चौधरी, कैलाश नशिने, नरेंद्र बुरडे, प्रशांत पवार, डॉ.श्रीकांत वैरागडे, सत्यवान हुकरे, विजय खोब्रागडे यांच्यासह अन्य संचालक व बँकेचे पदाधिकारी व अधिकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)