शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीतून नागरिकांना ‘स्लो पॉयझन’

By admin | Updated: December 5, 2015 00:36 IST

जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे दुषीत झाली आहे.

मासोळीचे प्रजोत्पादन घटले : नाग नदीच्या दूषित पाण्याचा फटकाप्रशांत देसाई भंडाराजिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे दुषीत झाली आहे. दूषित पाणी नदी प्रवाहात सोडण्यात येत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन होणाऱ्या मासोळ्यांच्या प्रमाणातही यावर्षी घट झाली आहे. हे दूषित पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल 'नीरी'ने दिला आहे. यामुळे जीवनवाहिनी वैनगंगा मृत्युवाहिनी झाल्याची प्रचिती येत आहे.भंडारा जिल्ह्यातून वाहनारी वैनगंगा नदी येथील नागरिकांची जीवनवाहिनी आहे. या नदीचे पात्र अवाढव्य असून येथून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा शेतीला फायदा व्हावा यासाठी शासनाने महत्वकांक्षी असा गोसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प उभारला. लाखो नागरिकांना वैनगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी मिळत आहे. यासोबतच, गोसेखुर्दमुळे हजारो हेक्टरमधील शेतातील पिकांनाही ते सोडण्यात येत असल्याने नागरिक व शेतीसाठी ही नदी जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून नागपूर येथील अत्यंत दुषीत पाणी नाग नदीच्या मुख्य प्रवाहात सोडण्यात येत आहे. हे पाणी आंभोरा येथील संगमावरून वैनगंगा नदीपात्रात विसर्जित होत आहे. नाग नदीत नागपूर येथील काही कारखाने व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसाय तथा अन्य प्रकल्पातून रासायनिकयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नाग नदीच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत आहे. यामुळे नदीलगतच्या गावांमधील हजारो नागरिकांना या दुषीत वाण्याच्या दुर्गंधीचा जबर त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा प्रवाह असल्याने ते वाहत होते. मात्र, आता पावसाळा नसल्याने व गोसेखुर्द प्रकल्पामुळे पाणी अडविण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह थांबला आहे. यामुळे प्रवाहविरहीत पाणी एकाच जागेवर थांबल्यामुळे हे काळेकुट्ट पाण्यातून अत्यंत दुर्गंधी येत आहे. वैनगंगा नदीवरून प्रवास करताना या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे असून नागपूर येथील नाग नदीचे पाण्याचा प्रवाह बदलविण्याची गरज आहे.दूषित पाण्यावर भागते तहानभंडारा शहरातील नागरिकांना पालिका प्रशासन याच वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी करते. अत्यंत घाण असलेले हे पाणी जलशुध्दीकरण यंत्रातून पुरवठा होत असला तरी, या यंत्रावरही शासंकता व्यक्त होत आहे. यासोबतच परिसरातील गावातही वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.मासोळ्यांच्या प्रजोत्पादनांवर परिणामनाग नदीच्या दुषीत पाण्यामुळे वैनगंगा नदी विषाच्या विळख्यात सापडली आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने जनावरे हे पाणी पिवून मृत्यूच्या दाढेत जात आहे. मागील वर्षीपर्यंत या नदीतून मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन होत होते. यावर्षी नदी पूर्णपणे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली असून एक प्रकारचे विष पाण्यात कालवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नदी पात्रात मासोळ्यांचे जीवन संपुष्टात आले आहे. याचा परिणाम त्यांच्या प्रजोत्पादनावर पडला आहे.