शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

खिळेमुक्त वृक्ष अभियानाला हवी जनतेची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:54 IST

संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशिल मनानी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे.

ठळक मुद्देवृक्ष संवर्धन : बॅनर, पोस्टर लावताना ठोकले जातात खिळे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशिल मनानी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे. मात्र हा उपक्रम लोकचळवळ व्हावी यासाठी जनतेचे सहकार्य हवे आहे.बॅनर, पोस्टर्स लावताना हमखास खिळ्यांचा उपयोग केला जातो. राज्य मार्गासह विविध ठिकाणच्या वृक्षांवर फ्लेक्स, बॅनर लावताना मोठ्या प्रमाणात खिळे वापरले जातात. वृक्षांनाही संवेदना असते. त्यांच्यातही प्राण असतो. हे विज्ञानाने सिद्ध केले. त्यानंतरही मनुष्य प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपले पोस्टर, बॅनर्स ठिकठिकाणी खिळ्याने ठोकतो. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा येथील खुशी बहुउद्देशिय संस्था, युवा जनकल्याण आणि पुणे येथील आंघोळीची गोळी या संस्थेने वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. भंडारा शहरात सात महिन्यांपूर्वी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरु झाली. एक हातोडी घेऊन ते आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढतात. आता त्यांच्या या मोहीमेत अनेक जण सहभागी झाले. शहरातीलच नव्हे तर राज्य मार्गावरील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाली आहेत. पहायला गेले तर झाडाचे खिळे काढणे खुप छोटे काम. परंतु यासाठीही कुणी पुढाकार घेत नाही. शहरातील नागरिकांनी आपला केवळ अर्धा तास दिला तरी शेकडो झाडे खिळेमुक्त होऊन बहरतील. यासाठी भंडारा शहरातील नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.सध्या भंडारा शहरात राजेश राऊत, जाधवराव साठवणे, नेमाजी करकाडे, हेमंत धुमनखेडे, आशिष भुरे, झेड.आय. डहाके, पंकज डहाके, मंगला डहाके, पूनम डहाके, स्वाती सेलोकर, मुक्ता बोंदरे, कुमार वरद डहाके, जय सेलोकर आदी खिळेमुक्त वृक्ष मोहीमेत सहभागी झाले आहेत. पाणी आणि वृक्ष बचतीचा हा संदेश ते नागरिकांना देत आहेत. आता भंडारातील वृक्षप्रेमी नागरिकांनी खिळेमुक्त वृक्ष मोहीमेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याला नगरपरिषदेनेही साथ दिल्यास ही मोहीम चांगली जोर धरेल.वृक्षाला खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई हवीजाहिरातीच्या नादात जाहिरातदार झाडावर खिळे ठोकून जाहिरातदार पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रके लावतात. त्यामुळे झाडांना इजा होते. शहराचे सौंदर्य बाधित होते. अशा व्यक्तींवर नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने झाडांना खिळे ठोकणे व विद्रुपीकरण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. संबंधितांना अवधी देऊन खिळे काढण्याचे आवाहन केले. याला न जुमानणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र विरुपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. असाच इशारा भंडारा नगरपरिषदेनेही द्यावा अशी मागणी वृक्ष प्रेमी करीत आहेत.