शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

खिळेमुक्त वृक्ष अभियानाला हवी जनतेची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:54 IST

संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशिल मनानी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे.

ठळक मुद्देवृक्ष संवर्धन : बॅनर, पोस्टर लावताना ठोकले जातात खिळे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संवेदनशिल मनाला जसे शब्द बोचतात तसेच प्रत्येक वृक्षालाही खिळे. जाहिरातबाजीच्या नादात राज्य मार्गासह ठिकठिकाणच्या वृक्षांवर खिळे ठोकले जातात. या खिळ्यांमुळे वृक्षांचे विद्रुपीकरण होते. तसेच वृक्षवाढीसाठी खिळे बाधाही पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशिल मनानी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे. मात्र हा उपक्रम लोकचळवळ व्हावी यासाठी जनतेचे सहकार्य हवे आहे.बॅनर, पोस्टर्स लावताना हमखास खिळ्यांचा उपयोग केला जातो. राज्य मार्गासह विविध ठिकाणच्या वृक्षांवर फ्लेक्स, बॅनर लावताना मोठ्या प्रमाणात खिळे वापरले जातात. वृक्षांनाही संवेदना असते. त्यांच्यातही प्राण असतो. हे विज्ञानाने सिद्ध केले. त्यानंतरही मनुष्य प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपले पोस्टर, बॅनर्स ठिकठिकाणी खिळ्याने ठोकतो. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा येथील खुशी बहुउद्देशिय संस्था, युवा जनकल्याण आणि पुणे येथील आंघोळीची गोळी या संस्थेने वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. भंडारा शहरात सात महिन्यांपूर्वी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरु झाली. एक हातोडी घेऊन ते आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढतात. आता त्यांच्या या मोहीमेत अनेक जण सहभागी झाले. शहरातीलच नव्हे तर राज्य मार्गावरील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाली आहेत. पहायला गेले तर झाडाचे खिळे काढणे खुप छोटे काम. परंतु यासाठीही कुणी पुढाकार घेत नाही. शहरातील नागरिकांनी आपला केवळ अर्धा तास दिला तरी शेकडो झाडे खिळेमुक्त होऊन बहरतील. यासाठी भंडारा शहरातील नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.सध्या भंडारा शहरात राजेश राऊत, जाधवराव साठवणे, नेमाजी करकाडे, हेमंत धुमनखेडे, आशिष भुरे, झेड.आय. डहाके, पंकज डहाके, मंगला डहाके, पूनम डहाके, स्वाती सेलोकर, मुक्ता बोंदरे, कुमार वरद डहाके, जय सेलोकर आदी खिळेमुक्त वृक्ष मोहीमेत सहभागी झाले आहेत. पाणी आणि वृक्ष बचतीचा हा संदेश ते नागरिकांना देत आहेत. आता भंडारातील वृक्षप्रेमी नागरिकांनी खिळेमुक्त वृक्ष मोहीमेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याला नगरपरिषदेनेही साथ दिल्यास ही मोहीम चांगली जोर धरेल.वृक्षाला खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई हवीजाहिरातीच्या नादात जाहिरातदार झाडावर खिळे ठोकून जाहिरातदार पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रके लावतात. त्यामुळे झाडांना इजा होते. शहराचे सौंदर्य बाधित होते. अशा व्यक्तींवर नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने झाडांना खिळे ठोकणे व विद्रुपीकरण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. संबंधितांना अवधी देऊन खिळे काढण्याचे आवाहन केले. याला न जुमानणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र विरुपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. असाच इशारा भंडारा नगरपरिषदेनेही द्यावा अशी मागणी वृक्ष प्रेमी करीत आहेत.