शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

पादचाऱ्याची भिंत कोसळली

By admin | Updated: October 19, 2015 00:47 IST

उजवा कालवा अंतर्गत बोरगाव नहराला जोडण्यात आलेली पादचाऱ्यांची बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली आहे.

पाणी वाटप प्रभावित : शेतकऱ्यांची ओरड, पाटबंधारे विभागाचा कारभारचुल्हाड (सिहोरा) : उजवा कालवा अंतर्गत बोरगाव नहराला जोडण्यात आलेली पादचाऱ्यांची बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली आहे. यामुळे शेत शिवारात पाणी वाटप प्रभावित झाले असून तात्काळ पाणी वाटप पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सिहोरा गावात शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यासाठी उजवा कालवा अंतर्गत बोरगाव नहर फाटावरून पादचाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. या पादचाऱ्यातील गाळ उपसा करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यामुळे धानाचे पिक अडचणीत आले आहे. दरम्यान गेल्यावर्षात या पादचाऱ्यांच्या निर्मितीवर १० लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. यात पादचाऱ्यांचे खोलीकरण, पुलाचे बांधकाम तथा सुरक्षा भिंत बांधकामाचे नियोजन होते. खरीप हंगामात पाणी वाटप करताना पादचाऱ्यांची भिंत पुर्णत: कोसळली आहे. या भिंतीचे बांधकाम निकृष्ठ झाले असल्याने कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. भिंत कोसळल्याने पाणी वाटप प्रभावित झाले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती लघु पाटबंधारे विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिली आहे. परंतु १४ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटपाची जबाबदारी ३ अमिन यांचे खाद्यांवर असल्याने शेतकऱ्यांची समस्या निकाली काढताना विलंब लागत आहे. उजवा आणि डावा कालव्याचे शाखा अभियंता पद प्रभारी आहेत. यामुळे शाखा अभियंताचे दर्शन दुर्लभ होत आहे. शेतकऱ्यांना गाऱ्हाणे आणि कैफियत मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध नाही, असे चित्र पाटबंधारे विभागात आहे. या पादचाऱ्या बांधकामावरील मंजुर राशीचे संपूर्ण देयकांची उचल करण्यात आली आहे. यामुळे कंत्राटदारावर कारवाई होणार नाही. यात शासकीय निधीचे वारे-न्यारे करण्यात आली आहेत.दरम्यान याच पादचारीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. परंतु अतिक्रमणातून पादचारींचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागात सध्या एक ना धड भाराभर चिध्या, असे वास्तव आहे. कुणी जबाबदार अधिकारी नसल्याने नहर आणि कालव्यावर जागोजागी शेतकऱ्यांनी पाईप लावले आहेत. यात पाण्याची पळवा पळवी सुरू झाली आहे. यामुळे टेलवरील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. चुल्हाड गावातील १०० एकर शेती यामुळे प्रभावित झाल्याने दुसऱ्यांदा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धाव घेतली आहे. परंतु साधे निवेदन घेणारे कर्मचारी हजर नव्हते. यामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. या कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसून येत आहे. पाणीपट्टी करांचे २०-३० लाख रूपये देणाऱ्या या कार्यालयाची अवस्था भंगारात काढणारी झाली आहे. शासनाने रिक्त पदे भरले नसल्याने ही अवस्था झाली आहे. शासनाने रिक्त पदे भरले नसल्याने ही अवस्था झाली आहे. या कार्यालयात शेतकऱ्यांना समाधानाचे उत्तर देणारे कुणी नसल्याने सैरवैर कारभार आहे.या कार्यालयात शाखा अभियंताचे स्थानांतरण झाले आहे. परंतु लाखांदुरातून हा शाखा अभियंता सिहोऱ्यात येण्याचे टाळत आहे. पाणी वाटपात कुणी टेंशन घेण्याचे तयारीत नाही. परंतु जबाबदार अधिकारी अभावी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे ३ अमिन याची मात्र चांगलीच गोची होत आहे. नहराची अवस्था वाईट आहे. केरकचऱ्यांनी तुंबली आहेत. मुरूम ऐवजी माती घालण्यात आली आहे. परंतु देयके मात्र नियोजित कामाचे उचल करण्यात आली आहे. काम आणि समस्या संदर्भात माहिती विचारली असता माहित नाही, हा एकच सुर ऐकायला येत आहे. सुरक्षा भिंत वर्षभरात पहिल्याच पाणी वाटपात कोसळल्याने शेतकऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या असून पाणी वाटप पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)