शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २० लाख ६६ हजार ९६१ क्विंटल तर अ ग्रेडचा ४५ हजार १९२ क्विंटल धान आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती १८१५ प्रमाणे ३८३ कोटी ४४ लाख ६३ हजार ६२३ रुपये आहे.

ठळक मुद्दे२१ लाख क्विंटल खरेदी : कोट्यवधीचे चुकारे थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय धान खरेदी बंद होण्याला अवघे तीन आठवडे असतांना शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीनेच धान खरेदीचे चुकारे देण्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जिल्ह्यात २१ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली असून त्याची आधारभूत दराने किंमत ३८३ कोटी ४४ लाख रुपये आहे. अद्यापही एकाही शेतकऱ्याला वाढीव दर आणि बोनसनुसार चुकारे दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत आहेत.भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २० लाख ६६ हजार ९६१ क्विंटल तर अ ग्रेडचा ४५ हजार १९२ क्विंटल धान आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती १८१५ प्रमाणे ३८३ कोटी ४४ लाख ६३ हजार ६२३ रुपये आहे. आतापर्यंत २७० कोटी ४८ लाख ७० हजार १९९ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तर ११२ कोटी ९५ लाख ९३ हजार ४२३ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. विशेष ही सर्व रक्कम आधारभूत किंमतीप्रमाणे आहे.शासनाने धानाला आधारभूत किंमती १८१५ रुपये घोषित केली. त्यानंतर शासनाने धानाला ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये प्रोत्साहन असे ७०० वाढीव दर दिले होते. याबाबत घोषणाही करण्यात आली होती. मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनुसारच म्हणजे १८१५ रुपयाप्रमाणे करण्यात आले. आधारभूत किंमतीचीच ११२ कोटी ९५ लाखांचे चुकाने थकीत आहेत. त्यात ७०० रुपये वाढीव दराची वाढ केल्यास हा आकडा कोट्यवधीच्या घरात जातो. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार चुकारेच करण्यात आले नाही. आधीच जिल्ह्यातील शेतकरी आसमानी संकटाचा सामना करीत आहे. शेतकºयांना पैशाची निकड असून धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.६८ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षाआधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील ६८ हजार ४१ शेतकऱ्यांनी आपला धान विकला आहे. आता ३० मार्चपासून धान खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे धान खरेदी बंद होण्यापुर्वी बोनससह सर्व रक्कमेचे चुकारे व्हावे, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र शासकीय स्तरावर वाढीव ७०० रुपयांच्या रकमेबाबद कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना बोनस आणि वाढीव रकमेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी