शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घरकूल लाभार्थ्यांना थकबाकी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST

प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुरू झाले. अनेकांनी आपल्या झोपड्या व घरे मोडकळीस काढून भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : अनेकांची कार्यालयात पायपीट ,चार हजार लाभार्थी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पंतप्रधान गृहनिर्माण योजना (शहरी) अंतर्गत घरकुल बांधकाम निधीअभावी अडकून पडली आहेत. कोरोना संकटामुळे घरकुल लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान प्रलंबीत असल्याने तातडीने घरकुल अनुदानाची थकबाकी द्यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेसचे महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी केली आहे.प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुरू झाले. अनेकांनी आपल्या झोपड्या व घरे मोडकळीस काढून भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. प्रशासनाने मंजूरी दिल्याने घरकुल बांधकाम सुरू केले. आतापर्यंत सर्व लाभार्थ्यांना फक्त एक लाख रुपये प्राप्त झाले आहेत.घरे उभारली आहेत, परंतु पाया घातल्यानंतरही अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठविलेले नाही. त्यामुळे बांधकाम पूर्णपणे थांबले आहे. दुसरा हप्ता घरकुल लाभार्थ्यांना जुलै २०१९ मध्ये प्राप्त झाला होता. राज्य सरकार मार्फत निधी प्राप्त झाला होता. परंतु केंद्र सरकारने अद्याप घरकुल योजनेसाठी निधीची तरतूद केलेली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी सावकाराकडून उसनवार घेऊन घरकुलाचे छत उभारले मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने प्लास्टंरिंग अभावी घरकुल गळू लागले आहेत, तर कुणी भाड्याच्या घरात आश्रयाला आहेत. घर मालकांना घरभाडे देणेही कठीण झाले आहे लॉकडाऊनमुळे घरकुल लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे तर दुसरीकडे सावकाराकडून कर्जाची वसुली करण्याकरिता दबाव आणला जात आहे. नगरपरिषद तुमसर येथे लाभार्थ्यांनी चकरा मारूनही निधी प्राप्त होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. शासनाने घरभाडे देऊन निवाºयाची व्यवस्था करावी, असे निवेदनातून लाभार्थ्यांनी केली आहे.

प्रधानमंत्री घरकूल योजनेचा शुभारंभ शहरात काही दिवसापूर्वी करण्यात आला. सुरवातीचे दोन हफ्ते लाभार्थ्यांना देवून त्यांना मोठी आशा दाखविण्यात आली मात्र गत वर्षभरापासून घरकुलाचे हप्ते मिळाले नसल्याने लाभार्थी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने वेळीच मदत करावी, अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल.- गौरीशंकर मोटघरे, काँग्रेस नेते तुमसर

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना