शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

प्रवाशांना वाटतो बसस्थानक असुरक्षित

By admin | Updated: April 16, 2015 00:22 IST

परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत

प्रवाशांमध्ये महामंडळाविरुद्ध रोष : भंडारा बसस्थानकात असुविधा, नियमित पोलीस बंदोबस्ताची गरजभंडारा : परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सोयी सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु यासेवा पुरविण्यात एसटी महामंडळ प्रशासन अपयशी ठरल्याचे मंगळवारी ‘लोकमत’ने प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले. वाढत्या भुरट्या चोऱ्या, पाकिट बेपत्ता होणे अशा विविध कारणामुळे बसस्थानक परिसर असुरक्षित बनल्याचे प्रवाशांच्या चर्चेअंती दिसून आले. सुट्यांमुळे बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येतात का? या अनुषंगाने ‘लोकमत’ने मंगळवारला सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणादरम्यान भंडारा बस स्थानकावरील सोयी सुविधांबाबत प्रवाशांचे मत जाणून घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे वास्तव समोर आले. बसने प्रवास करणे किती सुरक्षित आहे, याबाबत विचारले असता, ६५ टक्के प्रवाशांनी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचे सांगितले. २२ टक्के प्रवाशांना एसटीचा प्रवास असुरक्षित वाटतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमध्ये प्रथमोपचार सुविधा मिळत नसल्याचे ७५ टक्के प्रवाशांनी, तर बसची स्थिती पाहून प्रथमोपचार सुविधेबाबत विचारले असता २५ टक्के प्रवाशांनी मिळत नसल्याचे सांगितले. याशिवाय बस स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचारले असता ४५ टक्के प्रवाशांनी समाधानी नसल्याचे सांगितले. बसचे वेळापत्रक पाळले जाते कां? या प्रश्नावर ६२ टक्के प्रवाशांनी होय, तर ३८ टक्के प्रवाशांनी नाही, असे उत्तर दिले. प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा व सुरक्षेच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळ किती सज्ज आहे, हे वास्तव सर्व्हेक्षणातून समोर आले. पोलीस सुरक्षेबाबत समाधानी आहात कां? या प्रश्नावर १२ टक्के प्रवाशांनी पोलीस सुरक्षा असल्याचे सांगितले, तर पोलीस सुरक्षा नसल्याचे ८८ टक्के प्रवाशांचे मत आहे. यासंदर्भात प्रवाशांची मते विचारात घेतले असता भंडारा बसस्थानक परिसरात चोरटे वाढले असून अनेक प्रवाशांचे पाकिट बेपत्ता होतात. त्यामुळे पोलीस सुरक्षा चोख करण्यात यावी, अशा अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास प्रवाशांच्या उपचारासाठी प्रथमोपचार असणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.(लोकमत चमू)चोरटे मस्त; पोलीस सुरक्षा सुस्त