शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना वाटतो बसस्थानक असुरक्षित

By admin | Updated: April 16, 2015 00:22 IST

परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत

प्रवाशांमध्ये महामंडळाविरुद्ध रोष : भंडारा बसस्थानकात असुविधा, नियमित पोलीस बंदोबस्ताची गरजभंडारा : परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सोयी सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु यासेवा पुरविण्यात एसटी महामंडळ प्रशासन अपयशी ठरल्याचे मंगळवारी ‘लोकमत’ने प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले. वाढत्या भुरट्या चोऱ्या, पाकिट बेपत्ता होणे अशा विविध कारणामुळे बसस्थानक परिसर असुरक्षित बनल्याचे प्रवाशांच्या चर्चेअंती दिसून आले. सुट्यांमुळे बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येतात का? या अनुषंगाने ‘लोकमत’ने मंगळवारला सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणादरम्यान भंडारा बस स्थानकावरील सोयी सुविधांबाबत प्रवाशांचे मत जाणून घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे वास्तव समोर आले. बसने प्रवास करणे किती सुरक्षित आहे, याबाबत विचारले असता, ६५ टक्के प्रवाशांनी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचे सांगितले. २२ टक्के प्रवाशांना एसटीचा प्रवास असुरक्षित वाटतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमध्ये प्रथमोपचार सुविधा मिळत नसल्याचे ७५ टक्के प्रवाशांनी, तर बसची स्थिती पाहून प्रथमोपचार सुविधेबाबत विचारले असता २५ टक्के प्रवाशांनी मिळत नसल्याचे सांगितले. याशिवाय बस स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचारले असता ४५ टक्के प्रवाशांनी समाधानी नसल्याचे सांगितले. बसचे वेळापत्रक पाळले जाते कां? या प्रश्नावर ६२ टक्के प्रवाशांनी होय, तर ३८ टक्के प्रवाशांनी नाही, असे उत्तर दिले. प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा व सुरक्षेच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळ किती सज्ज आहे, हे वास्तव सर्व्हेक्षणातून समोर आले. पोलीस सुरक्षेबाबत समाधानी आहात कां? या प्रश्नावर १२ टक्के प्रवाशांनी पोलीस सुरक्षा असल्याचे सांगितले, तर पोलीस सुरक्षा नसल्याचे ८८ टक्के प्रवाशांचे मत आहे. यासंदर्भात प्रवाशांची मते विचारात घेतले असता भंडारा बसस्थानक परिसरात चोरटे वाढले असून अनेक प्रवाशांचे पाकिट बेपत्ता होतात. त्यामुळे पोलीस सुरक्षा चोख करण्यात यावी, अशा अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास प्रवाशांच्या उपचारासाठी प्रथमोपचार असणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.(लोकमत चमू)चोरटे मस्त; पोलीस सुरक्षा सुस्त