शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

प्रवाशांना वाटतो बसस्थानक असुरक्षित

By admin | Updated: April 16, 2015 00:22 IST

परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत

प्रवाशांमध्ये महामंडळाविरुद्ध रोष : भंडारा बसस्थानकात असुविधा, नियमित पोलीस बंदोबस्ताची गरजभंडारा : परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सोयी सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु यासेवा पुरविण्यात एसटी महामंडळ प्रशासन अपयशी ठरल्याचे मंगळवारी ‘लोकमत’ने प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले. वाढत्या भुरट्या चोऱ्या, पाकिट बेपत्ता होणे अशा विविध कारणामुळे बसस्थानक परिसर असुरक्षित बनल्याचे प्रवाशांच्या चर्चेअंती दिसून आले. सुट्यांमुळे बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येतात का? या अनुषंगाने ‘लोकमत’ने मंगळवारला सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणादरम्यान भंडारा बस स्थानकावरील सोयी सुविधांबाबत प्रवाशांचे मत जाणून घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे वास्तव समोर आले. बसने प्रवास करणे किती सुरक्षित आहे, याबाबत विचारले असता, ६५ टक्के प्रवाशांनी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचे सांगितले. २२ टक्के प्रवाशांना एसटीचा प्रवास असुरक्षित वाटतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमध्ये प्रथमोपचार सुविधा मिळत नसल्याचे ७५ टक्के प्रवाशांनी, तर बसची स्थिती पाहून प्रथमोपचार सुविधेबाबत विचारले असता २५ टक्के प्रवाशांनी मिळत नसल्याचे सांगितले. याशिवाय बस स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचारले असता ४५ टक्के प्रवाशांनी समाधानी नसल्याचे सांगितले. बसचे वेळापत्रक पाळले जाते कां? या प्रश्नावर ६२ टक्के प्रवाशांनी होय, तर ३८ टक्के प्रवाशांनी नाही, असे उत्तर दिले. प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा व सुरक्षेच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळ किती सज्ज आहे, हे वास्तव सर्व्हेक्षणातून समोर आले. पोलीस सुरक्षेबाबत समाधानी आहात कां? या प्रश्नावर १२ टक्के प्रवाशांनी पोलीस सुरक्षा असल्याचे सांगितले, तर पोलीस सुरक्षा नसल्याचे ८८ टक्के प्रवाशांचे मत आहे. यासंदर्भात प्रवाशांची मते विचारात घेतले असता भंडारा बसस्थानक परिसरात चोरटे वाढले असून अनेक प्रवाशांचे पाकिट बेपत्ता होतात. त्यामुळे पोलीस सुरक्षा चोख करण्यात यावी, अशा अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास प्रवाशांच्या उपचारासाठी प्रथमोपचार असणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.(लोकमत चमू)चोरटे मस्त; पोलीस सुरक्षा सुस्त