शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 13:38 IST

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवार कामाला लागले आहे.

ठळक मुद्देग्रामीण क्षेत्रात तापले राजकीय वातावरण

भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांतील पक्षश्रेष्ठींचा कस पणाला लागणार आहे. किंबहुना आतापासूनच आम्ही सर्वश्रेष्ठ उमेदवार कसे, याची साहेबांसमोर रंगीत तालीमही सुरू झाली आहे. प्रचाराला आठ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने सर्वच कामाला लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आकस्मिकपणे घोषित झालेल्या निवडणुकांमुळे अनेकांची हवी तेवढी तयारीही झाली नव्हती. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्याची वेळ उमेदवारांवर येऊन ठेपली आहे.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. राजकारणातील पुढील सक्रियतेची ही पहिली जणू पायरीच असते. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यावर त्यानंतर अनेकजण आमदार व खासदार झाल्याचेही उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी सदर क्षेत्र व गण आपल्या किती प्रभावाखाली आहे, हे पटवून देण्याचे कार्य रविवारपासून सुरू झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच राजकीय पक्षही या निवडणुकीला गांभीर्याने घेत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करणे सुरू केले आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेनासह आदींचा समावेश आहे.

जेवढी ओळख तेवढा प्रचार कमी

भाऊ, आपली सदर जिल्हा परिषद क्षेत्रात प्रचंड ओळख आहे. त्यामुळे अल्पावधीतच प्रचार कार्य आपण करू शकतो. म्हणजेच जेवढी ओळख तेवढा प्रचार कमी करून मताधिक्क्याने निवडून येऊ, असा विश्वास पक्ष श्रेष्ठींसमोर किंवा प्रभारींसमोर बोलून दाखविला जात आहे. एका एका क्षेत्रासाठी सहा ते सात उमेदवार मुलाखतीसाठी रांग लावत असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. यात ज्याचे जेवढे वजन तेवढीच आपली उमेदवारी पक्की असल्याचेही सांगून मोकळे होणारे उमेदवार दिसून येत आहेत.

शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची घोषणा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदींसह अन्य पक्षांत उमेदवारांची चाचपणी करणे सुरू आहे. एका जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी पाच पेक्षा जास्त तर कुठे आठ ते नऊ उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहात आहेत. कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. मात्र, नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणीच पक्षाची उमेदवारी मिळेल याची घोषणा शेवटच्या टप्प्यातच होईल, असे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ग्रामीण वातावरण तापले

जिल्हा पातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच ग्रामीण वातावरणही यातून सुटलेले नाही. चहाटपरी, चौपाल व अन्य सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थांच्या तोंडी एकच चर्चा असते, ती म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची. अमक्या भागातून या उमेदवाराला उमेदवारी हमखास मिळणार, याची पैज लावण्याचेही प्रमाण दिसून येत आहे. सध्या ग्रामीणमधून मुख्यालय गाठून तिकिटांसंबंधी वशिलेबाजी करण्याचेही प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणpanchayat samitiपंचायत समितीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद