शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 13:38 IST

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवार कामाला लागले आहे.

ठळक मुद्देग्रामीण क्षेत्रात तापले राजकीय वातावरण

भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांतील पक्षश्रेष्ठींचा कस पणाला लागणार आहे. किंबहुना आतापासूनच आम्ही सर्वश्रेष्ठ उमेदवार कसे, याची साहेबांसमोर रंगीत तालीमही सुरू झाली आहे. प्रचाराला आठ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने सर्वच कामाला लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आकस्मिकपणे घोषित झालेल्या निवडणुकांमुळे अनेकांची हवी तेवढी तयारीही झाली नव्हती. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्याची वेळ उमेदवारांवर येऊन ठेपली आहे.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. राजकारणातील पुढील सक्रियतेची ही पहिली जणू पायरीच असते. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यावर त्यानंतर अनेकजण आमदार व खासदार झाल्याचेही उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी सदर क्षेत्र व गण आपल्या किती प्रभावाखाली आहे, हे पटवून देण्याचे कार्य रविवारपासून सुरू झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच राजकीय पक्षही या निवडणुकीला गांभीर्याने घेत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करणे सुरू केले आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेनासह आदींचा समावेश आहे.

जेवढी ओळख तेवढा प्रचार कमी

भाऊ, आपली सदर जिल्हा परिषद क्षेत्रात प्रचंड ओळख आहे. त्यामुळे अल्पावधीतच प्रचार कार्य आपण करू शकतो. म्हणजेच जेवढी ओळख तेवढा प्रचार कमी करून मताधिक्क्याने निवडून येऊ, असा विश्वास पक्ष श्रेष्ठींसमोर किंवा प्रभारींसमोर बोलून दाखविला जात आहे. एका एका क्षेत्रासाठी सहा ते सात उमेदवार मुलाखतीसाठी रांग लावत असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. यात ज्याचे जेवढे वजन तेवढीच आपली उमेदवारी पक्की असल्याचेही सांगून मोकळे होणारे उमेदवार दिसून येत आहेत.

शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची घोषणा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदींसह अन्य पक्षांत उमेदवारांची चाचपणी करणे सुरू आहे. एका जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी पाच पेक्षा जास्त तर कुठे आठ ते नऊ उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहात आहेत. कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. मात्र, नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणीच पक्षाची उमेदवारी मिळेल याची घोषणा शेवटच्या टप्प्यातच होईल, असे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ग्रामीण वातावरण तापले

जिल्हा पातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच ग्रामीण वातावरणही यातून सुटलेले नाही. चहाटपरी, चौपाल व अन्य सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थांच्या तोंडी एकच चर्चा असते, ती म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची. अमक्या भागातून या उमेदवाराला उमेदवारी हमखास मिळणार, याची पैज लावण्याचेही प्रमाण दिसून येत आहे. सध्या ग्रामीणमधून मुख्यालय गाठून तिकिटांसंबंधी वशिलेबाजी करण्याचेही प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणpanchayat samitiपंचायत समितीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद