शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पर्यावरण संवर्धन कार्यात सहभाग गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:12 IST

लंडनला उच्चशिक्षण घेऊन भारतासारख्या देशात काम करण्याचे ठरविले. कारण वन्यजीवांचे संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे. जीवनात कोणतेही कार्य करताना ते आव्हानात्मक असल्याशिवाय जीवनात आनंद नसतो.

ठळक मुद्देदिशा शर्मा : साकोलीच्या मनोहरभाई पटेल महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लंडनला उच्चशिक्षण घेऊन भारतासारख्या देशात काम करण्याचे ठरविले. कारण वन्यजीवांचे संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे. जीवनात कोणतेही कार्य करताना ते आव्हानात्मक असल्याशिवाय जीवनात आनंद नसतो. म्हणून तरुणांना निराश न होता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पर्यावरण वन्यजीवांचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन पशुवैद्यकीय वन्यजीव अधिकारी डॉ.दिशा शर्मा यांनी केलेसाकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरीश त्रिवेदी हे होते. व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया, दिल्लीतर्फे क्षेत्रीय अधिकारी व समाजशास्त्रज्ञ महेंद्र राऊत, क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दिशा शर्मा व क्षेत्रीय अधिकारी व जीवशास्त्रज्ञ निखील दांडेकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्त्यांच्या स्वागतानंतर नेचर क्लबचे संयोजक डॉ.एल.पी. नागपूरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या व्याख्यानमालेचे महत्त्व पर्यावरण शास्त्रीय विद्यार्थ्यांना पटवून दिले व म्हणाले, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध स्तरावर हे कसे करता येते हे स्पष्ट केले तर पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे कायदे व धोरणे लोकांच्या व समाजाच्या हितासाठी आहेत. त्या दिशेने कार्य करताना आपली कार्यशैली व लोकांचे हित या दोन्ही बाजू समतोलपणे सांभाळाव्या लागतात हे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे वक्ते व क्षेत्रीय अधिकारी महेंद्र राऊत यांनी पर्यावरणशास्त्र शिकताना ते कृतीशील असावे व प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या जैविक क्षेत्रांचा अभ्यास होणे व पर्यावरणाच्या संवर्धनाचे बारकावे समजून घेणे व शाश्वत कार्यप्रणाली कशी सांभाळावी, यावर भर दिला. विद्यार्थ्यांना आग्रह केला की, नेचर क्लबच्या माध्यमातून विशिष्ट उपक्रमामध्ये सहभागी होऊन सर्वांना हे उत्तमरीत्या शिकता येतो म्हणून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी एक चित्रफित दाखवून वन्यजीव संवर्धनात केलेल्या वैशिष्टपूर्ण कार्याचा आढावा दिला.कार्यक्रमाचे तिसरे वक्ते निखील दांडेकर यांनी वन्यजीव संवर्धनात नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण कुठलेही शिक्षण जरी घेत असाल तरी वन्यजीव संवर्धनाच्या विभिन्न स्तरावर तुम्हाला कार्य करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यासाठी शिक्षणाच्या प्रत्येक पातळीवर आपण फावल्या वेळात वेगवेगळ्या संस्थेसोबत कार्य करावे. ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व ज्ञानात वृद्धी होते. तेच आपल्या जीवनात लाभकारी ठरते.कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरीश त्रिवेदी म्हणाले की, आजच्या तिन्ही वक्त्यांच्या ज्ञानाचा व कार्यशैलीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धन या राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान द्यावे व शिक्षणाला अर्थ प्रदान करावा हे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अनुष्का सिंग हिने केले. कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता डॉ.सी.जे. खुणे, प्रा.अमीत जगीया, डॉ.धार्मीक, गणवीर, गौरव गणवीर, साक्षी जगीया, हेमा सोनवाने, काजल भांडारकर, प्रियांशी थानथराटे यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :environmentवातावरण