शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मंगल कार्यालयांचे पार्किंग रस्त्यावर

By admin | Updated: April 25, 2016 00:30 IST

लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे.

रहदारीला अडथळा : अपघाताची शक्यता, पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षभंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेवली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शहरात सद्यस्थितीत २० ते २५ मंगल कार्यालय व सभागृह आहेत. बऱ्याच सभागृहांना व मंगल कार्यालयात पार्किंगची सोय नाही. या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईच्या हंगामात तर प्रत्येक दिवस या कार्यालयात गर्दी असते. समारंभासाठी येणारे आमंत्रित पाहुणे, वऱ्हाडी, लक्झरी गाड्या, चारचाकी व दुचाकीने येतात. विशेष म्हणजे ही सर्व वाहने ठेवण्यासाठी मंगल कार्यालयात स्वतंत्र पार्किंगची सोय असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. मंगल कार्यालय किंवा सभागृह सुरु करताना मालकाला नगरपालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. पार्किंगची सोय, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट, शेजारच्या नागरिकांना त्रास होण्याची हमी आदी अटी पूर्ण केल्यावरच पालिकेतर्फे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु प्रत्यक्षात या अटीचे पालन होताना दिसत नाही. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक प्रसिद्ध व वर्दळ असणाऱ्या मंगल कार्यालये व सांस्कृतिक सभागृहासमोर वाहनतळ नाही. त्यामुळे कुठलाही समारंभ व कार्यक्रम असल्यास त्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या, दुचाकी व अन्य वाहने कार्यालयासमोर व रस्त्याच्या कडेला ठेवल्या जातात. विशेष म्हणजे या मार्गाने शहरातील मुख्य वाहतूक सुरु असते. मोठ्या बसेस, कार व इतर छोटी मोठी वाहन रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे या मार्गाला रस्ता म्हणावे की, पार्कींग प्लेस असा प्रश्न पडतो. सभागृहाचे मालक या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. त्यामुळे पार्किंग ही अत्यावश्यक सेवा पुरविणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. परंतु नगरपालिकांना किंवा पोलीस प्रशासन या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यांना नोटीस पाठविले जात नाही. त्यामुळे दररोज लाखोंची आवक असणारे कार्यालयाचे मालक वा संचालक या गोष्टींकडे बेजबाबदारपणे पाहत आहेत.अरुंद रस्ते, त्यातच रस्त्याच्या बाजूला अस्त्यवस्तपणे ठेवलेल्या वाहनांमुळे या रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होत आहे. अनेक वेळा सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. किरकोळ अपघाताच्या घटना रोजच्या रोज घडत आहेत. यातच वादावादीचे प्रमाणही वाढत आहेत. मंगल कार्यालय व सभागृहाच्या मालकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सामान्य नागरिकांनी का सोसावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई केल्याशिवाय ही समस्या मार्गी लागणार नाही. (नगर प्रतिनिधी)