शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो, मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा ! अपेक्षांचे ओझे लादू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:05 IST

आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो.

ठळक मुद्देकमी गुण मिळाले तरी मुलांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करा

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने पैकीच्या पैकी गुण मिळावावे अशी अपेक्षा असते. सर्वांनाच पैकीच्या पैकी गुण मिळणे शक्य नाही. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तरी पालकांनो मुलांचा निकाल आनंदाने स्वीकारा. प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करा. आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो.सध्या दहावी-बारावीचे निकाल घोषित होत आहेत. लॉकडाऊनने निकालाला विलंब झाल्याने प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांची उत्सूकता शिगेला पोहचली होती. मात्र गत दोन दिवसात सीबीएसई आणि राज्य परीक्षा मंडळाचे निकाल घोषित होत आहेत. विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळत आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारीही वाढत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थीही परीक्षांमध्ये चांगले गुण घेत आहेत. मात्र अलिकडे स्पर्धेच्या युगात पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या मुलाने १०० पैकी १०० गुण मिळावे अशी अपेक्षा असते. बहुतांश पालक मुलांच्या अभ्यासाकडे सुरुवातीपासूनच लक्ष देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होते. मात्र निकाल घोषित झाल्यानंतर प्रत्येक पालकांच्या चेहऱ्यावर काहीसे वेगळेच भाव दिसून येतात. एखाद्या विद्यार्थ्याला ९० टक्के गुण मिळाले तरी पालक समाधानी दिसत नाहीत.

आपल्या मुलाला अधिक गुण मिळाले असते असे सांगताना दिसून येतात. कमी गुण मिळाल्याचे खापर शाळा, पाल्य आणि घरच्या मंडळीवरच फोडले जाते. मात्र आपल्या मुलाचा बुध्यांक नेमका किती होता, त्याने परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला याचा विचार केला जात नाही.विशेष म्हणजे वर्गातील इतर मुलांना आपल्या मुलापेक्षा अधिक गुण मिळाले तर आणखीनच खजील झाल्यासारखे पालकांना वाटते. अनेक पालक तर मुलांना रागावतानाही दिसून येतात. अलिकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दोन दशकापूर्वी ७० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचा पालक अभिमानाने मुलाचे कौतूक करायचा. परंतु आता ९५ टक्के गुण मिळाले तरी पालकाच्या मनात कुठेतरी अढी असते. यापेक्षा आणखी अधिक गुण मिळविणे अपेक्षित असतात. या सर्व प्रकारात पालक मात्र आपल्या दहावी-बारावीतील गुणांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. कुणी याबाबत छेडले तर आमच्या काळी सुविधा नव्हत्या. नाही तर आम्हालाही चांगले गुण मिळाले असते असे सांगतात.

परीक्षेतील गुण म्हणजे यशाचे मापदंड नव्हे. कमी गुण घेणारे अनेक विद्यार्थी आयुष्यात मोठे झालेले दिसून येतात. तर अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी मागे पडलेले दिसतात. त्यामुळे दहावी बारावीच्या गुणावरून मुलांचे गुणांकन करू नका. जो काही निकाल आला असेल तो आनंदाने स्वीकारा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.

गुणवंतांच्या कौतूकासोबत नापासांचे मनोबल वाढवापरीक्षेत यश-अपयश येत असते. अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक केले जाते. त्यांना प्रोत्साहन दिले जाते. मात्र गुणवंतांचे कौतूक करताना परीक्षेमध्ये नापास झालेल्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. आधुनिक पिढीही अतिशय संवेदनशिल आहे. कुणाच्या मनावर कधी विपरीत परिणाम होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कमी गुण मिळाले किंवा पाल्य नापास झाला तरी त्याला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. नापास झालेला विद्यार्थी पुन्हा पास होऊन जीवनात मोठे ध्येय बाळगू शकतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना घरातून प्रोत्साहनाची गरज आहे. घरच्यांनीच त्यांना नाउमेद केले तर ते करणार तरी काय? गुणवंतांच्या कौतूकासोबतच नापासांचेही मनोबल वाढविणे तेवढेच महत्वाचे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकाल