शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कीडनाशक फवारणीमुळे धानपीक वाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 00:30 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून दररोज पाऊस पडत असल्याने ..

पाऊस पिच्छा सोडेना : अस्मानी-सुलतानी संकटाचा सामनाकोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून दररोज पाऊस पडत असल्याने हलक्या धानाचे पीक मातीमोल होत आहेत. अशातच शेतकऱ्यांनी धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रार्दुभाव झाल्यामुळे कोसरा (कोंढा) येथील लक्ष्मी अ‍ॅग्रो एजन्सीतून सानवॉस कंपनीचे औषधी घेऊ न फवारणी केली असता शेतकऱ्यांचे उभे पीक वाळले. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेतकरी चौरास भागात धानाचे पिक वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत आहे. पण निसर्गासोबत मानवी चुकामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक जात आहे. कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी धानपिकावर तुडतुडा किडीचा प्रार्दुभाव वाढल्याने लक्ष्मी अ‍ॅग्रो एंजन्सी कोसरा येथून सानवॉस औषध दुकानदाराच्या सल्ल्यानुसार घेतले. सदर औषधी शेतात स्प्रे पंपाद्वारे फवारणी केली असता धान पिक रोगमुक्त होण्याऐवजी वाळून गेले आहे.या किडनाशक औषधाची धान पिकावर रिअ‍ॅक्शन झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान वाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव येथील श्रीधर येळणे यांच्या चार एकरातील धानपीक वाळल्याने २ लाख रूपयाचे नुकसान झाले. धनराज मोहरकर, रा. पिंपळगाव, मारोती जिभकाटे रा.कोंढा या शेतकऱ्यांचे धान या औषधीने वाळले. याशिवाय औषधी फवारणीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.भंडारा/पालांदूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने अजुनही पिच्छा सोडलेला नाही. शेकडो एकरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. पावसामुळे हलके धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी याचे सर्वेक्षण झालेले नाही. परंतु याची आकडेवारी कोट्यवधी घरात आहे. कालपासुन जिल्ह्यात वरूणराजाने दमदार हजेरी लावली. पालांदूर परिसरात मुसळधार पावसामुळे धान जमीनदोस्त झाले आहे. हलक्या धानाची नासाडी झाली आहे. नुकसानीचा आकडा सर्वेक्षणअभावी प्राप्त होऊ शकला नाही तरी उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने घोषीत केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे काढली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिना उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. परतीच्या पावसाने सुरुवात केली. हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे.कापलेल्या धानाच्या कडपामध्ये पाणी शिरले आहे. या कडपांमधून वास येत असून बळीराजाचे टेंशन वाढले आहे. धान कमी पण निंदण जास्त अशी स्थिती सप्टेंबर महिन्याच्या पहिला व दुसऱ्या हप्त्यात होती. ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुडतुडा, लष्करी अळी, करपा या रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)औषधी डिफॉल्ट असल्याचे वाटत आहे. यासंबंधात पिकांचे सँपल काढून प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.-ए. डी. गजभिये, तालुका कृषी अधिकारी, पवनी.पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र साकोली, येथील वैज्ञानिकांची चमू पिकांचे निरीक्षण करुन अहवाल तयार करतील कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात येईल.- बी.एन.मेहर, कृषी विस्तार अधिकारी, पवनीसानवॅस कंपनीचा डीलर आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर औषधाची विक्री बंद केली आहे. शेतकऱ्यांला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यास पूर्णपणे मदत करणार आहे.- पी.पी. लांजेवार, संचालक लक्ष्मी अ‍ॅग्रो एजन्सी, कोसरा.