शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पंचायत समितीची वसाहत ‘जीर्णावस्थेत’

By admin | Updated: January 8, 2015 22:50 IST

येथील पंचायत समितीची वसाहत मागील विस वर्षापासून जीर्णवस्थेमध्ये आहे. याच वसाहतीमध्ये एका महिला खंडविकास अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता.

लाखांदूर : येथील पंचायत समितीची वसाहत मागील विस वर्षापासून जीर्णवस्थेमध्ये आहे. याच वसाहतीमध्ये एका महिला खंडविकास अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तेव्हापासून या वसाहतीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.या ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण न केल्याने त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देवून नव्याने वसाहत बांधकाम करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. लाखांदूर हे साकोली तालुक्यात होते. तेव्हाच येथे पंचायत समिती कार्यालयाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी १९६८ मध्ये तत्कालीन केंद्रीय समाजकल्याण मंत्री अशोक मेहता यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद अध्यक्ष कृ .दा. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. काही वर्षानंतर त.सा. २५ गट नं. ३४७ आराजी ३१.१४ हे. आर.मधील १० एकरामध्ये पंचायत समितीचा प्रशस्त कार्यालय सुरू करण्यात आले व अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण करण्यात आले व अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण करण्यात आले व अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. मागील विस वर्षाअगोदर या ठिकाणी अधिकारी राहत होते. सन २००२ -२००३ या कालावधी मध्ये तत्कालीन खंडविकास अधिकारी श्रीमती बी.बी. शेख ह्या राहत असतांना पाहूण्या म्हणून आलेला त्यांच्या नंनद ह्या सर्पदंशाने मृत्यू पावला होत्या. तेव्हापासून त्याठिकाणी राहायला कुणीही तयार नव्हते.सदर जागा ही जि.प. झुडपी जंगलात येत होती. त्याचे सदर वसाहतीच्या सभोवताल केरकचरा झाडे होते व सद्या स्थितीमध्ये सदर पडलेला वसाहती सभोवताल झाडे आहेत. तर सदर ठिकाणी चार बंगले हे भग्णावस्थेत आहेत. सदर वसाहती मोडकळीस आल्यामुळे ती जागा व इमारती निकामी आहेत.पंचायत समितीचे अधिकारी हे सद्या भाड्याच्या घरात किंवा मोठया शहरातून ये -जा करतात. जिल्ह्यात सातही तालुक्यात पंचायत समिती कार्यालयाकरिता एवढी जागा कुठेही उपलब्ध नाही एवढी जागा लाखांदूर पंचायत समितीला आहे. परंतु त्याचा उपयोग होत नसल्यामुळे तालुक्यातील जनतेचे कामे वेळेवर होत नाही व जनतेला ही याठिकाणी सोई सुविधा नाही. तर ४६ वर्षाची इमारत जीर्ण झाल्यामुळे याठिकाणी मागील वर्षी जि.प. भंडारा यांनी डागडूजीसाठी १३ लाख रुपये खर्च केले. परंतु नवीन बांधकाम करायला लोकप्रतिनिधी पुढे धजावू शकत नाही. त्यामुळे सदर पंचायत समितीची वसाहत दुरू स्त करू न राहण्यायोग्य करण्यात यावी व खाली जागेचा सदुपयोग करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे अशी मागणी तालुक्यातील जनतेनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)