शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : शेतात पाणी साचून पेंढ्या भिजल्या, काढलेले धान वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धान पीक उध्वस्त केले असून कापणीला आलेला धान पावसात ओला होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणात परतीच्या पावसाने शेतकºयावर संकटाचा डोंगर उभा केला. शेकडो हेक्टरमधील कापलेल्या धानाच्या पेंढ्या (कडपा) पावसात ओल्या झाल्या असून बांध्याही पावसाच्या पाण्याचे तुडूंब भरल्याचे चित्र आहे.गत आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस कोसळला. दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.दिवाळीतच पावसाने शेतकºयाचे दिवाळे काढले. तुमसर, साकोली, लाखनी तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला. मोठ्या आशेने शेतकºयांनी धानाची कापणी सुरू केली होती. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.शेतकºयांच्या आशेवर फेरले पाणीयावर्षी कधी नव्हे ते धानाचे पीक समाधानकारक होते. विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धान पिकाची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरमध्ये कापणीला आलेला धान आता पावसात भिजल्याने सडत आहे.दिवाळी सुट्यामुळे पंचनामे लांबणारपरतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. परंतु दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पंचनामे लांबण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस सुट्या आहे. नुकसानीचा पंचनामा २४ तासात होणे गरजेचे असल्याने पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. आता यावर प्रशासन कोणता तोडगा काढते आणि कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहेशेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई द्या- नरेंद्र भोंडेकरपरतीच्या पावसाने जिल्ह्यात विशेषत: भंडारा विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात ते जिल्हाधिकारी आणि महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. आमदार भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. शेतकºयांचे सांत्वन करीत त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस