शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : शेतात पाणी साचून पेंढ्या भिजल्या, काढलेले धान वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धान पीक उध्वस्त केले असून कापणीला आलेला धान पावसात ओला होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणात परतीच्या पावसाने शेतकºयावर संकटाचा डोंगर उभा केला. शेकडो हेक्टरमधील कापलेल्या धानाच्या पेंढ्या (कडपा) पावसात ओल्या झाल्या असून बांध्याही पावसाच्या पाण्याचे तुडूंब भरल्याचे चित्र आहे.गत आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस कोसळला. दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.दिवाळीतच पावसाने शेतकºयाचे दिवाळे काढले. तुमसर, साकोली, लाखनी तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला. मोठ्या आशेने शेतकºयांनी धानाची कापणी सुरू केली होती. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.शेतकºयांच्या आशेवर फेरले पाणीयावर्षी कधी नव्हे ते धानाचे पीक समाधानकारक होते. विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धान पिकाची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरमध्ये कापणीला आलेला धान आता पावसात भिजल्याने सडत आहे.दिवाळी सुट्यामुळे पंचनामे लांबणारपरतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. परंतु दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पंचनामे लांबण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस सुट्या आहे. नुकसानीचा पंचनामा २४ तासात होणे गरजेचे असल्याने पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. आता यावर प्रशासन कोणता तोडगा काढते आणि कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहेशेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई द्या- नरेंद्र भोंडेकरपरतीच्या पावसाने जिल्ह्यात विशेषत: भंडारा विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात ते जिल्हाधिकारी आणि महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. आमदार भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. शेतकºयांचे सांत्वन करीत त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस