शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : शेतात पाणी साचून पेंढ्या भिजल्या, काढलेले धान वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धान पीक उध्वस्त केले असून कापणीला आलेला धान पावसात ओला होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणात परतीच्या पावसाने शेतकºयावर संकटाचा डोंगर उभा केला. शेकडो हेक्टरमधील कापलेल्या धानाच्या पेंढ्या (कडपा) पावसात ओल्या झाल्या असून बांध्याही पावसाच्या पाण्याचे तुडूंब भरल्याचे चित्र आहे.गत आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस कोसळला. दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.दिवाळीतच पावसाने शेतकºयाचे दिवाळे काढले. तुमसर, साकोली, लाखनी तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला. मोठ्या आशेने शेतकºयांनी धानाची कापणी सुरू केली होती. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.शेतकºयांच्या आशेवर फेरले पाणीयावर्षी कधी नव्हे ते धानाचे पीक समाधानकारक होते. विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धान पिकाची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरमध्ये कापणीला आलेला धान आता पावसात भिजल्याने सडत आहे.दिवाळी सुट्यामुळे पंचनामे लांबणारपरतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. परंतु दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पंचनामे लांबण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस सुट्या आहे. नुकसानीचा पंचनामा २४ तासात होणे गरजेचे असल्याने पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. आता यावर प्रशासन कोणता तोडगा काढते आणि कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहेशेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई द्या- नरेंद्र भोंडेकरपरतीच्या पावसाने जिल्ह्यात विशेषत: भंडारा विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात ते जिल्हाधिकारी आणि महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. आमदार भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. शेतकºयांचे सांत्वन करीत त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस