शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीची मर्यादा साडेआठ लाख क्विंटलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी सुरू झालेली धान खरेदी तीन दिवसांतच बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्याला शासनाकडून उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र वाढ अल्प करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :  धान खरेदीच्या मर्यादेवरून जिल्ह्यात वादळ उठले असताना शासनाने आता धान खरेदीची मर्यादा पाच लाखांहून साडेआठ लाख क्विंटलवर केली आहे. याबाबत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सोमवारी नवीन परिपत्रक काढले आहे. मर्यादा वाढविली असली तरी तीही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा रोष कायम आहे. संपूर्ण धान खरेदीची शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी सुरू झालेली धान खरेदी तीन दिवसांतच बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्याला शासनाकडून उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र वाढ अल्प करण्यात आली.

१५ जूनपर्यंत धान खरेदी

- जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सोमवार ६ जूनला काढलेल्या नव्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत सुरू असलेल्या सर्व संस्थांना रब्बी पणन हंगाम २०२१- २०२२ साठी जुन्या पत्रकानुसार धान खरेदीकरिता ४ लाख ९१ हजार ९९६ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. नव्या पत्रकानुसार उद्दिष्ट तीन लाख ७७ हजार ५४७ क्विंटल वाढविण्यात आलेले आहे. त्यामुळे आता खरेदीचे उद्दिष्ट आठ लाख ६९ हजार ५४४ क्विंटल ठरवून दिल्याचे म्हटलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्रनिहाय नसून जिल्हानिहाय आहे. तसेच आपल्या खरेदी केंद्रावर १५ जूनपर्यंत धान खरेदीचे काम पूर्ण करावयाचे आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड