शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जिल्ह्यात केवळ १५ केंद्रांवर धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 21:29 IST

अनेक केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना आयडी देण्यात आली नव्हती. अनियमितता करणाऱ्या केंद्रांना ५० हजार ते एक लाखापर्यंत दंडही ठोठावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. २३३ पैकी १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांना खरेदीची मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वेगाने धान खरेदी सुरू झाली नाही. जिल्ह्यातील केवळ १५ केंद्रांवर खरेदी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत २३३ केंद्रांना मंजुरी दिली असली तरी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बहुतांश सर्वच केंद्रांवरील मान्यता रखडली होती. आता १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने या केंद्रांना खरेदीची मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात केवळ १५ केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे.भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी योजनेचा शुभारंभ झाला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. त्यातच अनेक केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना आयडी देण्यात आली नव्हती. अनियमितता करणाऱ्या केंद्रांना ५० हजार ते एक लाखापर्यंत दंडही ठोठावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. २३३ पैकी १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांना खरेदीची मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वेगाने धान खरेदी सुरू झाली नाही. जिल्ह्यातील केवळ १५ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. त्यातही सर्वाधिक केंद्र पवनी तालुक्यातील आहेत.भंडारा तालुक्यात १७ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ५६ शेतकऱ्यांनी २३४७ क्विंटल धानाची विक्री केली आहे. लाखनी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी ५६ क्विंटल तर लाखांदूर तालुक्यात २६ शेतकऱ्यांनी ८८७ क्विंटल आणि पवनी तालुक्यातील १५५ शेतकऱ्यांनी ६३०३ क्विंटल धान पणन महासंघाला विकला आहे. विशेष म्हणजे मोहाडी, तुमसर आणि साकोली तालुक्यात अद्याप एक क्विंटलही धानाची खरेदी झाली नाही. अद्याप खरेदी केंद्र सुरूच झाले नसल्याने शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचण येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांची अद्यापही ऑनलाईन नोंदणी झाली नाही. ३० नोव्हेंबरनंतर धान खरेदीला वेग येईल, असे पणन महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.

२३९ शेतकऱ्यांनी विकला धान

- जिल्ह्यातील प्रत्यक्ष सुरू झालेल्या १५ केंद्रांवर आतापर्यंत केवळ २३९ शेतकऱ्यांनी धान विकला आहे. नऊ हजार ५९४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून आतापर्यंत ८१ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर १५० शेतकऱ्यांनी नोंदणीचा ॲप डाऊनलोड केला आहे. दोन लाख २३ हजार शेतकरी नोंदणीकृत असून अद्यापही सुमारे दीड लाख शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. दोन आठवड्यांत नोंदणी करण्याचे दिव्य शेतकऱ्यांना पार पाडावे लागणार आहे.

शेतकरी धान खरेदी केंद्रांच्या शोधात- पणन महासंघाने धान खरेदीसाठी १२२ केंद्रांना परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात केवळ १५ केंद्र सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विकताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी आपल्या परिसरातील धान खरेदी केंद्र सुरू झाले काय, याचा शोध घेत आहे. केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांना धान विकावा लागत आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड