शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:09 IST

भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली.

ठळक मुद्देपावसाची दडी : एक लाख ६१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार हेक्टरवरच रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली आहे. एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३९५ हेक्टरवर रोवणी झाली आहे. एकुण क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी आटोपली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत.भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली. परंतु गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पाऊस कोसळत आहे. काही भागात तर पावसाचे दर्शनही झाले नाही. परिणामी रोवणी रखडली आहे. भंडारा तालुक्यात २१३०६ हेक्टर रोवणीचे क्षेत्र असून आतापर्यंत केवळ १९५७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. मोहाडी तालुक्यातील २७०९६ हेक्टर पैकी ५७३० हेक्टर, तुमसर तालुक्यात २७ हजार ५६९ हेक्टरपैकी ५३२५ हेक्टर, पवनी १८ हजार ६९२ हेक्टर पैकी २९६९ हेक्टर, साकोली १८ हजार ५०१ हेक्टर पैकी ८७४० हेक्टर, लाखनी २२ हजार ६३१ हेक्टर पैकी ६७१२ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यातील २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रापैकी ५७९८ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. नियोजित क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी झाली आहे.पावसाने दडी मारल्याने रोवणी रखडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३० मिमी असून आतापर्यंत ४४६.२ मिमी पाऊस कोसळला आहे. त्यातही अनेक भागात पावसाने दर्शनच दिले नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय रोवणी करणे शक्य नाही. ओलीताची सोय असलेले शेतकरी रोवणी करीत असले तरी त्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. रोवणी लांबल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक सर्वसाधारण धानाची लागवड केली जाते. कमी कालावधीत निघणारा हा धान असून रोवणीस उशीर झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.जिल्ह्यात सरासरी ४४६ मिमी पावसाची नोंदभंडारा जिल्ह्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ४४६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुका ५५९ मिमी, मोहाडी ४०७.६ मिमी, तुमसर ३०४.० मिमी, पवनी ४५०.७ मिमी, साकोली ५१२.८ मिमी, लाखांदूर ३३७.२ मिमी आणि लाखनी ५५१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २१ जुलै पर्यंत प्रत्यक्ष पडणाºया पावसाच्या तुलनेत हा पाऊस ९० टक्के असला तरी रोवणीयोग्य मात्र निश्चितच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणी रखडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस