शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:09 IST

भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली.

ठळक मुद्देपावसाची दडी : एक लाख ६१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार हेक्टरवरच रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली आहे. एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३९५ हेक्टरवर रोवणी झाली आहे. एकुण क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी आटोपली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत.भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली. परंतु गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पाऊस कोसळत आहे. काही भागात तर पावसाचे दर्शनही झाले नाही. परिणामी रोवणी रखडली आहे. भंडारा तालुक्यात २१३०६ हेक्टर रोवणीचे क्षेत्र असून आतापर्यंत केवळ १९५७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. मोहाडी तालुक्यातील २७०९६ हेक्टर पैकी ५७३० हेक्टर, तुमसर तालुक्यात २७ हजार ५६९ हेक्टरपैकी ५३२५ हेक्टर, पवनी १८ हजार ६९२ हेक्टर पैकी २९६९ हेक्टर, साकोली १८ हजार ५०१ हेक्टर पैकी ८७४० हेक्टर, लाखनी २२ हजार ६३१ हेक्टर पैकी ६७१२ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यातील २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रापैकी ५७९८ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. नियोजित क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी झाली आहे.पावसाने दडी मारल्याने रोवणी रखडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३० मिमी असून आतापर्यंत ४४६.२ मिमी पाऊस कोसळला आहे. त्यातही अनेक भागात पावसाने दर्शनच दिले नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय रोवणी करणे शक्य नाही. ओलीताची सोय असलेले शेतकरी रोवणी करीत असले तरी त्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. रोवणी लांबल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक सर्वसाधारण धानाची लागवड केली जाते. कमी कालावधीत निघणारा हा धान असून रोवणीस उशीर झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.जिल्ह्यात सरासरी ४४६ मिमी पावसाची नोंदभंडारा जिल्ह्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ४४६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुका ५५९ मिमी, मोहाडी ४०७.६ मिमी, तुमसर ३०४.० मिमी, पवनी ४५०.७ मिमी, साकोली ५१२.८ मिमी, लाखांदूर ३३७.२ मिमी आणि लाखनी ५५१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २१ जुलै पर्यंत प्रत्यक्ष पडणाºया पावसाच्या तुलनेत हा पाऊस ९० टक्के असला तरी रोवणीयोग्य मात्र निश्चितच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणी रखडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस