शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

५०० एकरातील धानपीक काळवंडले

By admin | Updated: October 5, 2016 00:35 IST

अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी धानपीकाची पेरणी केली. पाऊसही बरसला.

पाऊस नाही, धान नाही : भंडारा तालुक्यातील धारगाव क्षेत्रातील प्रकारभंडारा : अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी धानपीकाची पेरणी केली. पाऊसही बरसला. पऱ्हयांची स्थिती चांगली असताना रोवणीच्या हंगामात पावसाने पाठ फिरविली. परिणामी धारगार जिल्हा परिषद क्षेत्रातील जवळपास ५०० एकरातील धानपिक पावसाअभावी काळवंडले आहेत. यामुळे बळीराजाचा जीव मेटाकुटीला आला असून पिकाच्या सर्वेक्षणाची मागणी आहे.भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यात भंडारा तालुक्यातही धानाची लागवड करण्यात आली. यातील चांदोरी मालीपार, कोकणागढ, डव्वा, सितापूर (गांगलेवाडा), गुंथारा, खुर्शिपार, वाघबोडी, माडगी (टेकेपार), पिंपळगाव, पलाडी, आमगाव (दिघोरी), शिंगोरी, राजेगाव (एमआयडीसी) आदी क्षेत्रातील धानपिक पाण्याअभावी संकटात सापडले. मान्सुन हंगामात जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ७२ असली तरी पावसाचा लहरीपणा कायम राहिला. भंडारा तालुक्यात पावसाची सरासरी टक्केवारी ७२ इतकी आहे. परंतु पाऊस कुठे बरसला अन् कुठे नाही, अशी स्थिती निर्माण झाली. सुरूवाती पासून ते परतीच्या हंगामापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी धारगाव क्षेत्रात वरूणराजाची अवकृपा झाली. या पट्यात अपेक्षेप्रापाणे पाऊस बरसला नाही. आज येईल, उद्या बरसेल, या आशेवर या परिसरातील शेतकऱ्यांनी धानपिक कसेतरी जिंवत ठेवले. मात्र ‘पावसाने’ या क्षेत्राला दोन हात दुरच ठेवले. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी रोवणी पूर्ण केली; परंतु जिथे शेती पूर्णत: पावसावर अवलंबून होती तिथे बळीराजा पावसाच्या हजेरीवर विंसबून होता. पाऊस न बरसल्याने रोवणी होऊ शकली नाही. जिथे रोवणी झाली पण सिंचनाअभावी पीक वाढू शकले नाही. अशा उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास गावांमधील जवळपास ५०० एकरातील धानपीक कालवंडले आहे. (प्रतिनिधी)तुडतुडा, करपा रोग कायम : सर्वेक्षण नाहीधानपिक गर्भावस्थेत असताना तुडतुडा, करपा, काणी, लष्करी अळी आदी किड व रोगाने आक्रमण केले. परिणामी धानावर पुन्हा संकट कोसळले. महागडी औषध करून शेतकऱ्यांनी फवारणी केली. पावसाचा दगा कायम राहिल्याने हातात आलेले पिकही वाया जाणार आहे. अशा स्थितीत नासाडी झालेल्या धानपिक क्षेत्राचे सर्वेक्षण करून सबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असलेल्या बळीराजा अविरत संघर्षातून धानपिक घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र शासनस्तरावर योग्य वेळी मदत दिली जात नाही. चांदोरीसह परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसला नाही. शेकडो हेक्टर जमीन पडीत राहणार आहे. शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना थोडीफात मदत मिळू शकेल. - राजपती खराबे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, चांदोरी.तुडतुडा, करपा, लष्करी अळी या रोगाने हातात आलेले पिक संकटात आले आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाने या क्षेत्रावर कृपादृष्टी घातली नाही. डोळयासमोर हातात आलेले धानपिक कालवंडले असून आर्थिक कोंडी वाढली आहे. - सिताराम बंसोड, शेतकरी चांदोरी.