शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

५०० एकरातील धानपीक काळवंडले

By admin | Updated: October 5, 2016 00:35 IST

अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी धानपीकाची पेरणी केली. पाऊसही बरसला.

पाऊस नाही, धान नाही : भंडारा तालुक्यातील धारगाव क्षेत्रातील प्रकारभंडारा : अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी धानपीकाची पेरणी केली. पाऊसही बरसला. पऱ्हयांची स्थिती चांगली असताना रोवणीच्या हंगामात पावसाने पाठ फिरविली. परिणामी धारगार जिल्हा परिषद क्षेत्रातील जवळपास ५०० एकरातील धानपिक पावसाअभावी काळवंडले आहेत. यामुळे बळीराजाचा जीव मेटाकुटीला आला असून पिकाच्या सर्वेक्षणाची मागणी आहे.भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यात भंडारा तालुक्यातही धानाची लागवड करण्यात आली. यातील चांदोरी मालीपार, कोकणागढ, डव्वा, सितापूर (गांगलेवाडा), गुंथारा, खुर्शिपार, वाघबोडी, माडगी (टेकेपार), पिंपळगाव, पलाडी, आमगाव (दिघोरी), शिंगोरी, राजेगाव (एमआयडीसी) आदी क्षेत्रातील धानपिक पाण्याअभावी संकटात सापडले. मान्सुन हंगामात जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ७२ असली तरी पावसाचा लहरीपणा कायम राहिला. भंडारा तालुक्यात पावसाची सरासरी टक्केवारी ७२ इतकी आहे. परंतु पाऊस कुठे बरसला अन् कुठे नाही, अशी स्थिती निर्माण झाली. सुरूवाती पासून ते परतीच्या हंगामापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी धारगाव क्षेत्रात वरूणराजाची अवकृपा झाली. या पट्यात अपेक्षेप्रापाणे पाऊस बरसला नाही. आज येईल, उद्या बरसेल, या आशेवर या परिसरातील शेतकऱ्यांनी धानपिक कसेतरी जिंवत ठेवले. मात्र ‘पावसाने’ या क्षेत्राला दोन हात दुरच ठेवले. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी रोवणी पूर्ण केली; परंतु जिथे शेती पूर्णत: पावसावर अवलंबून होती तिथे बळीराजा पावसाच्या हजेरीवर विंसबून होता. पाऊस न बरसल्याने रोवणी होऊ शकली नाही. जिथे रोवणी झाली पण सिंचनाअभावी पीक वाढू शकले नाही. अशा उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास गावांमधील जवळपास ५०० एकरातील धानपीक कालवंडले आहे. (प्रतिनिधी)तुडतुडा, करपा रोग कायम : सर्वेक्षण नाहीधानपिक गर्भावस्थेत असताना तुडतुडा, करपा, काणी, लष्करी अळी आदी किड व रोगाने आक्रमण केले. परिणामी धानावर पुन्हा संकट कोसळले. महागडी औषध करून शेतकऱ्यांनी फवारणी केली. पावसाचा दगा कायम राहिल्याने हातात आलेले पिकही वाया जाणार आहे. अशा स्थितीत नासाडी झालेल्या धानपिक क्षेत्राचे सर्वेक्षण करून सबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असलेल्या बळीराजा अविरत संघर्षातून धानपिक घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र शासनस्तरावर योग्य वेळी मदत दिली जात नाही. चांदोरीसह परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसला नाही. शेकडो हेक्टर जमीन पडीत राहणार आहे. शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना थोडीफात मदत मिळू शकेल. - राजपती खराबे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, चांदोरी.तुडतुडा, करपा, लष्करी अळी या रोगाने हातात आलेले पिक संकटात आले आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाने या क्षेत्रावर कृपादृष्टी घातली नाही. डोळयासमोर हातात आलेले धानपिक कालवंडले असून आर्थिक कोंडी वाढली आहे. - सिताराम बंसोड, शेतकरी चांदोरी.