शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भातपिकाचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2015 00:33 IST

हस्त नक्षत्रातील पाऊस हा सर्व शेतकऱ्यांसाठी नेहमी संकट घेवून येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील सध्या सुरू असलेले हस्त नक्षत्र आपले रूप दाखवून बळीराजाची चिंता

नेरळ : हस्त नक्षत्रातील पाऊस हा सर्व शेतकऱ्यांसाठी नेहमी संकट घेवून येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील सध्या सुरू असलेले हस्त नक्षत्र आपले रूप दाखवून बळीराजाची चिंता आणखी वाढवत आहे. वादळी वाऱ्यासह येत असलेल्या सोसाट्याच्या पावसाने शेतातील भाताची रोपे पडत आहेत. कर्जत तालुक्यातील किमान अर्धी भाताची रोपे शेतात कोसळली असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या संकटात आणखी भर म्हणजे सध्या सुरु असलेला पाऊस ७ आॅक्टोबरपर्यंत थांबणार नाही असे वेधशाळा सांगत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाचे बदललेले रूप आता अधिक धोकादायक स्वरूप धारण करताना दिसत आहे. आधीच बळीराजा पावसाच्या लहरीपणामुळे चिंतेत असतो, त्यात आता आणखी भर पडत आहे. यंदा चार महिन्यात पाऊस कमी आणि सूर्यप्रकाश जास्त अशी स्थिती पावसाळा असून देखील पहायला मिळाली होती. त्यानंतर गणपती येण्याआधी पडलेल्या पावसामुळे किमान भाताचे पीक हाती येईल अशी शक्यता निर्माण झाली. पूर्वी हस्त नक्षत्रातील पाऊस हा सलग सर्व भागात दररोज लागून राहत नसे, जिकडे होईल तिकडे नुकसान करण्याचा हस्त नक्षत्राचा नेहमीचा दिनक्र म यावेळी नवीन पायंडा घालताना दिसत आहे. यावेळी २७ सप्टेंबरला सुरूझालेले हस्त नक्षत्र आपले रंग सर्व भागांना दाखवताना दिसत आहे. त्याने येतानाच वादळी वाऱ्याची सोबत घेतली असून विजांचा कडकडाट ही सोबतीला आहेत.कर्जत तालुक्यातील भाताचे पीक हस्त नक्षत्रातील पावसामुळे धोक्यात येताना दिसत आहे. भाताच्या शेतात उभे असलेले रोप हे भाताच्या लोंब्यामुळे अधिक वजनदार झाले आहे. त्यामुळे साधा वारा आला तरीही ते खाली कोसळण्याची भीती असते. मात्र वादळी वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील अर्धे अधिक भाताची रोपे जमिनीवर कोसळली आहेत. त्यानंतर पावसाने आपली संततधार कायम ठेवल्याने शेतकऱ्याच्या मनात अधिक भीती निर्माण झाली आहे. पाऊस आणखी आठ दिवस असाच कोसळत राहिल्यास शेतात पडलेल्या भाताला पुन्हा नवीन कोंब फुटू शकतात. त्यामुळे हाती येणारे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दहा हजार हेक्टर जमिनीवर भाताचे पीक पावसाळ्यात घेतले जाते. (वार्ताहर)