शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही कर्जमुक्त करण्याची आश्वासने शासनाने दिली असली तरी सध्याचे शासन यासबंधाने शेतकऱ्यांना चिंंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सभागृह, प्रयोगशाळा व वर्गखोलीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : केंद्र व राज्य पुरस्कृत आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत धान श्रेणीनुसार जवळपास १८४० रुपये प्रती क्विंटल आधारभूत मूल्य दिले जात आहे. मात्र या किमतीत राज्य शासनाने ५०० रुपयांची दरवाढ केल्याने आता धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाला प्रती क्विंटल २३४० रुपये भाव मिळणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी आयोजीत सभागृह, प्रयोगशाळा व वर्गखोली उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, महिला प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य प्रमीला कुटे, देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप बुराडे, शुद्धमता नंदागवळी, प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, तहसीलदार संतोष महल्ले, ठाणेदार शिवाजी कदम, जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता कैलाश शहारे, तत्वराज अंबादे, सुभाष राऊत, भुमेश्वर महावाडे, ईश्वर घोरमोडे आदी उपस्थित होते.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही कर्जमुक्त करण्याची आश्वासने शासनाने दिली असली तरी सध्याचे शासन यासबंधाने शेतकऱ्यांना चिंंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही. घरकुल बांधकामाच्या सहायाने चौरासातील झुडुपी जंगल नियमाने पिडीत लाभार्थ्यांना न्याय मिळण्याहेतू राज्य शासनाला आवश्यक त्या सुचनादेखील करणार आहे. गोरगरीब जनतेसह शेतकरी शेतमजुरांना व बेरोजगारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास अंगीकारावा, असे आवाहन केले.यावेळी हजारो नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्तविक जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य के. एस. ईनमुलवार यांनी केले. संचालन राजेश्वरी शेंडे व लक्ष्मण बगमारे यांनी तर, आभार प्रदर्शन ए. बी. पारधी यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकत, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले