शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

तलावाच्या जिल्ह्यात सिंचनाअभावी भातशेती झाली कोरडवाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:52 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्दे८० टक्के विहिरी पडल्या कोरड्या। धानाचे पऱ्हे जगवणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौरास) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी उन्हाळ्यामध्ये हिरवेगाव दिसणारे शेत दिसेनासे झाले असून भात शेतकऱ्यांना धानाचे पऱ्हे (नर्सरी) जगवणे कठीण झाले आहे.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. तीच नाळ चौरास भागाशी जुळली आहे. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प झाला आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून चौरास भागात विहिरीला पाणी पुरवठा होणारा प्रवाह धरणाच्या पाळीचे बांधकाम करण्यात आले. येथूनच चौरास भागातील शेतीला घरघर लागली. कालांतराने नदीचा प्रवाह बदलला गेला. तरीही जमीनीच्या आतमध्ये वैनगंगा नदीच्या भूमिगत प्रवाह चौरास परिसरात सुरु होता.चौरास भागात मोठ्या प्रमाणावर जलसाठा होता. त्यामुळे शेतकरी जेथे विहिर खोदेल तेथे जलसाठा मिळत होता व कृषी पंप चालत होते. सर्वात जास्त विद्युत पंप आता ही चौरास भागात आहेत. पण आता बंद पडलेले आहेत. यापुर्वी खरीप धान, रबी डाळ वर्गीय पिके, रबी धान या तिन्ही फसली शेतकरी हमखास घेत होता. मात्र आता त्याला एकाही पिकाची हमी राहिलेली नाही.धरणामुळे परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु ३२ वर्षाचा कालावधी लोटूनही व प्रकल्प पूर्ण झाला असला तरी उजव्या व डाव्या कालवाच्या पाणी वाहून नेणाऱ्या वितरीका पूर्ण झाल्या नाहीत. या कालव्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळणे दुर्लक्षीत झाले आहे.गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासाठी चौरास भागातून २२ किमी लांबीचा डावा कालवा तयार करण्यात आला. शेतकरी दरवर्षी या कालव्यातून पाणी मिळेल म्हणून वाट पाहात आहेत. मात्र धरणाच्या वितरीकेची कामे सुरु होतात. पण पूर्ण ती पूर्ण केली जात नाही. दिवसेंदिवस कालव्याच्या रकमेत चौपटीने वाढ होत असल्याचे सांगण्यात येतेबळीराजाच्या चिंतेत वाढ, संसारासाठी उसनवारचौरास भागात असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाअभावी निसर्गाचा पाण्याची आवश्यकता आहे. असे असताना मृग नक्षत्र लोटूनही पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन शेती कसण्यासाठी उसनवार रक्कम घेत आहेत.

टॅग्स :agricultureशेती