शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसात धान पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने बुधवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून कापणीला आलेले धान पीक उद्ध्वस्त केले. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसाने शेकडो हेक्टरवरील पीक भुईसपाट झाले आहे. तर कापलेले कडपे ओले झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा या पावसाने घात केला.बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.लाखनी तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला. पालांदूर, खराशी, खुनारी, डोंगरगाव, मुरमाडी, जेवनाळा, मचारणा, कवलेवाडा, मेंगापूर आदीसह अनेक गावात जोरदार पाऊस कोसळला. पवनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. हस्ती नक्षत्राचा पाऊस बरसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. उभे पीक आडवे झाले असून कडपा ओल्या झाल्या आहे. सर्वाधिक फटका चौरास भागातील आसगाव परिसराला बसला आहे.तुमसर तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सायंकाळीसुद्धा पाऊस बरसत होता. तालुक्यातील पवनारा, सिहोरा, चुल्हाड यासह अनेक गावांना या पावसाचा फटका बसला.मोहाडी तालुक्यात सायंकाळी ४ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेत. लाखांदूर आणि साकोली तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.कापणी झालेला धान वाचविण्याची धडपडजिल्ह्यात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. गत तीन चार दिवसांपासून कापणीला वेग आला. मात्र बुधवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतात कापूण ठेवलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. कडपा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड चालविल्याचे चित्र दिसत होते. मात्र पाऊस जोरदार असल्याने कडपा वाचविण्याची उसंतही शेतकऱ्यांना मिळाली नाही.शेतकऱ्यांवर संकटाची मालिकाधान उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा संकटाची मालिका दिसत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने धान पीक धोक्यात आले होते. शेतकऱ्यांनी यासंकटावर मात केली तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या महापुराचा शेकडो हेक्टर धान पिकाला फटका बसला. यातून सावरत नाही तोच आता बुधवारी परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातचा घास हिसकावून नेला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस