शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पावसात धान पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने बुधवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून कापणीला आलेले धान पीक उद्ध्वस्त केले. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसाने शेकडो हेक्टरवरील पीक भुईसपाट झाले आहे. तर कापलेले कडपे ओले झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा या पावसाने घात केला.बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.लाखनी तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला. पालांदूर, खराशी, खुनारी, डोंगरगाव, मुरमाडी, जेवनाळा, मचारणा, कवलेवाडा, मेंगापूर आदीसह अनेक गावात जोरदार पाऊस कोसळला. पवनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. हस्ती नक्षत्राचा पाऊस बरसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. उभे पीक आडवे झाले असून कडपा ओल्या झाल्या आहे. सर्वाधिक फटका चौरास भागातील आसगाव परिसराला बसला आहे.तुमसर तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सायंकाळीसुद्धा पाऊस बरसत होता. तालुक्यातील पवनारा, सिहोरा, चुल्हाड यासह अनेक गावांना या पावसाचा फटका बसला.मोहाडी तालुक्यात सायंकाळी ४ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेत. लाखांदूर आणि साकोली तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.कापणी झालेला धान वाचविण्याची धडपडजिल्ह्यात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. गत तीन चार दिवसांपासून कापणीला वेग आला. मात्र बुधवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतात कापूण ठेवलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. कडपा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड चालविल्याचे चित्र दिसत होते. मात्र पाऊस जोरदार असल्याने कडपा वाचविण्याची उसंतही शेतकऱ्यांना मिळाली नाही.शेतकऱ्यांवर संकटाची मालिकाधान उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा संकटाची मालिका दिसत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने धान पीक धोक्यात आले होते. शेतकऱ्यांनी यासंकटावर मात केली तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या महापुराचा शेकडो हेक्टर धान पिकाला फटका बसला. यातून सावरत नाही तोच आता बुधवारी परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातचा घास हिसकावून नेला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस