शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पावसात धान पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने बुधवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून कापणीला आलेले धान पीक उद्ध्वस्त केले. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसाने शेकडो हेक्टरवरील पीक भुईसपाट झाले आहे. तर कापलेले कडपे ओले झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा या पावसाने घात केला.बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.लाखनी तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला. पालांदूर, खराशी, खुनारी, डोंगरगाव, मुरमाडी, जेवनाळा, मचारणा, कवलेवाडा, मेंगापूर आदीसह अनेक गावात जोरदार पाऊस कोसळला. पवनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. हस्ती नक्षत्राचा पाऊस बरसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. उभे पीक आडवे झाले असून कडपा ओल्या झाल्या आहे. सर्वाधिक फटका चौरास भागातील आसगाव परिसराला बसला आहे.तुमसर तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सायंकाळीसुद्धा पाऊस बरसत होता. तालुक्यातील पवनारा, सिहोरा, चुल्हाड यासह अनेक गावांना या पावसाचा फटका बसला.मोहाडी तालुक्यात सायंकाळी ४ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेत. लाखांदूर आणि साकोली तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.कापणी झालेला धान वाचविण्याची धडपडजिल्ह्यात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. गत तीन चार दिवसांपासून कापणीला वेग आला. मात्र बुधवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतात कापूण ठेवलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. कडपा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड चालविल्याचे चित्र दिसत होते. मात्र पाऊस जोरदार असल्याने कडपा वाचविण्याची उसंतही शेतकऱ्यांना मिळाली नाही.शेतकऱ्यांवर संकटाची मालिकाधान उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा संकटाची मालिका दिसत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने धान पीक धोक्यात आले होते. शेतकऱ्यांनी यासंकटावर मात केली तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या महापुराचा शेकडो हेक्टर धान पिकाला फटका बसला. यातून सावरत नाही तोच आता बुधवारी परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातचा घास हिसकावून नेला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस