शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

मागासवर्गीय बहुजन समाजाचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय बहुजन अधिकारी-कर्मचारी कामगार संघटना समन्वय समिती व कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने ...

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय बहुजन अधिकारी-कर्मचारी कामगार संघटना समन्वय समिती व कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव सीताराम कुंठे यांना निवेदन देण्यात आले. बिंदुनामावलीतील रोस्टरप्रमाणे पदोन्नतीतील आरक्षण, रिक्त पदे भरणे, कंत्राटी पद्धती बंद करणे, खासगी कंपन्या व कारखान्यांमध्ये आरक्षण लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे या संदर्भाने महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष म.ना. कांबळे यांच्या नेतृत्वात महासचिव राजेंद्र कांबळे, महासचिव एस. एस. हुमने यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष डॉ. मधुकर रंगारी यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, जिल्हा सचिव हरिचंद्र धांडेकर, महिला अध्यक्ष रजनी वैद्य, सहसचिव गोपाल सेलोकर, उपाध्यक्ष अमोल देशपांडे, सिद्धार्थ भोवते, युवराज रामटेके, ॲड. टी.एस.सिंगाडे, डॉ. देवानंद नंदागवळी, प्रभू मते, अजाबराव चिचामे, गोवर्धन कराडे, प्रवीण राठोड, देवानंद नागदेवे, विजय नंदागवळी, अजय रामटेके आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

समाजातील एस. सी., एन. टी., व्हीजे एनटी, ओबीसी, एसटी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी व पदाधिकारी तसेच आम जनता यामध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आक्रोश निर्माण झालेला आहे. मागासवर्गीय पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण, मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या पदोन्नत्या थांबविल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील आदेशानुसार थांबविले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री गट समितीच्या सदस्यांनी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असे सांगितले. शासन परिपत्रक पाहता आरक्षण कायद्यानुसार बहाल केलेले पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण काढून घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयात मागासवर्गीयांचे आरक्षण टिकणार नाही हेच यातून दिसून येत आहे. असंख्य मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी पदोन्नतीवरुन सेवानिवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मागासवर्गीयांना त्यांच्या हक्काच्या पदावर पदोन्नती देणेऐवजी ते ३३ टक्के पदावर सर्व खुल्या प्रवर्गातून केवळ सेवाज्येष्ठता यादीतून पदे भरणे हे मागासवर्गीयांवर अन्यायकारक आहे. सरकारने ते परिपत्रक मागासवर्गीयांच्या हिताचे नसल्याने ते रद्द करून पूर्वीपासून ते आरक्षण धोरण व आरक्षण कायद्याप्रमाणे बिंदुनामावलीनुसार केवळ मागासवर्गीयांना ३३ टक्के पदोन्नती देण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने ४४ कायद्यांचे चार कायद्यात रूपांतर केले आहे. यामुळे भारतात लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आले आहेत. युनियनला मान्यता देण्याच्या कायद्यानुसार यापूर्वी युनियनला अधिकार होता, तो अधिकार आता मालकांना देण्यात येणार आहे. ते कायदे रद्द करून पूर्वीप्रमाणे कामगारांच्या व संघटनांच्या हिताचे करावेत. देशात दिवसेंदिवस जातीय अत्याचार वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सर्व खासगी उद्योग व खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे. महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना पदवी, पदवी पूर्व शिक्षणासाठी सुरू करण्यात याव्या. विदेशातील उच्च शिक्षणाकरिता स्कॉलरशिपची मर्यादा वाढवून देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.