शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे.

ठळक मुद्देकृषी कर्मचारी नुकसानीच्या कामात व्यस्त : बळीराजा सापडला संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा, बघेडा, चिचोली, कारली, मिटेवानी परिसरात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे धानपिकावर विविध रोग कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर सातत्याने विविध संकटे कोसळली आहेत. आधीच वाढलेल्या धानशेतीच्या खर्चामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे आता उरले सुरले पीकही रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निसटले जाण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाच्या तलाठ्यांनी ग्रामीण स्तरावर पाहणी करून पंचनामे करण्याची गरज आहे. शेतकरी चिंतातूर झाला असून पवनारा, चिचोली, बघेडा, कारली, चिखला परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रोवणी आटोपली होती. त्यानंतर काही दिवस सातत्याने ऊन व ऑगस्ट अखेर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खोडकिडा, गादमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कडा करपा रोगही वाढत असून त्यामुळे काही ठिकाणी धानपीक पिवळे पडत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.तलाठ्यांनी बळीराजाची दखल घेण्याची गरजप्रत्येक तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ग्रामीण स्तरावर कृषी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र याला काही ठिकाणी तलाठ्यांचा अपवाद असल्याचेही दिसून येत आहे. महसूल विभागाचे ग्रामीण भागातील तलाठी कारणे सांगून शेतकऱ्यांना पाहणीसाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मदत मिळण्यासाठी ज्यांच्या हाती महसूल विभागाची सूत्रे आहेत तेच तलाठी बळीराजाला नडवत असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :agricultureशेती