शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे.

ठळक मुद्देकृषी कर्मचारी नुकसानीच्या कामात व्यस्त : बळीराजा सापडला संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा, बघेडा, चिचोली, कारली, मिटेवानी परिसरात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे धानपिकावर विविध रोग कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर सातत्याने विविध संकटे कोसळली आहेत. आधीच वाढलेल्या धानशेतीच्या खर्चामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे आता उरले सुरले पीकही रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निसटले जाण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाच्या तलाठ्यांनी ग्रामीण स्तरावर पाहणी करून पंचनामे करण्याची गरज आहे. शेतकरी चिंतातूर झाला असून पवनारा, चिचोली, बघेडा, कारली, चिखला परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रोवणी आटोपली होती. त्यानंतर काही दिवस सातत्याने ऊन व ऑगस्ट अखेर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खोडकिडा, गादमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कडा करपा रोगही वाढत असून त्यामुळे काही ठिकाणी धानपीक पिवळे पडत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.तलाठ्यांनी बळीराजाची दखल घेण्याची गरजप्रत्येक तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ग्रामीण स्तरावर कृषी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र याला काही ठिकाणी तलाठ्यांचा अपवाद असल्याचेही दिसून येत आहे. महसूल विभागाचे ग्रामीण भागातील तलाठी कारणे सांगून शेतकऱ्यांना पाहणीसाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मदत मिळण्यासाठी ज्यांच्या हाती महसूल विभागाची सूत्रे आहेत तेच तलाठी बळीराजाला नडवत असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :agricultureशेती