शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:57 IST

कृषी विभाग भंडारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यासाठी हरभऱ्याची लागवड शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रज्ञा गोडघाटे : चिखलीत हरभºयाची लागवड, कमी खर्चात जास्त पिकाचे प्रात्याक्षिक

आॅनलाईन लोकमतखरबी (नाका) : कृषी विभाग भंडारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यासाठी हरभऱ्याची लागवड शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.शेती शाळेचे उद्घाटन विभागीय कृषी सहायक प्रज्ञा गोडघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर तसेच मंडळ कृषी अधिकारी दिपक आहेरू, कृषी सहायक रेणुका दराडे, बीटीएम सतीश वैरागडे उपस्थित होते.यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना प्रज्ञा गोळाघाटे यांनी हरभरा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीची मशागत, अरूंद सरी, वरबापद्धत बीज प्रक्रिया, तुषार सिंचनद्वारे पाण्याचे नियोजन, किडरोग व्यवस्थापन तसेच पक्षी थांबायच्या वापर केल्यास किडीवरती आळा घालता येतो, असे आपल्या मार्गदर्शनात शेतकºयांना सांगितले. यावेळी प्रगतशिल शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतातील पाणाण भेद या औषधी वनस्पतीची पाहणी करून इतर शेतकºयांनीही सेंद्रीय शेतीकडे वळण्यास सांगितले.कृषी विभागाच्या वतीने ग्राम चिखली येथील ५० शेतकºयांनी गट सेंद्रीय शेतीसाठी निवडला असून शेतकºयांना गांढूळखत निर्मिती, अर्का विषयी प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी कृषी मित्र श्याम आकरे याने कमी खर्चात एकरी १४ क्विंटल धानाचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. यावेळी शेतकºयानी शेती करण्याच्या निर्धार केला. त्यानंतर कृषी साहाय्यक रेणुका दराडे यांनी १० ते १४ मार्च दरम्यान दसरा मैदान भंडारा येथे होणाºया कृषी महोत्सवात महिला बचत गटानी आपआपल्या मालाच्या विक्रीकरीता तसेच शेतकºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर यांनी आपल्या मनोगणात शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगून यावर्षीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, ठिंबक, तुषार सिंचन योजनांच्या लाभ घेऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दिपक अहेर यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतखताच्या फायद्या मोठ्या प्रमाणात होत असतो. शेतीशाळेच्या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी कृषीमित्र, ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सतीश वैरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी गायधने यांनी केले.