शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेतील साहित्य जप्तीचे आदेश

By admin | Updated: November 26, 2015 00:35 IST

शासनाने राज्यातील शिखर बँकेसह २९ जिल्ह्यातील भूविकास बँक बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

भंडारा : शासनाने राज्यातील शिखर बँकेसह २९ जिल्ह्यातील भूविकास बँक बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर असून अनेकांना सक्तीने पदमुक्त करण्यात येत आहे. अशास्थितीत भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिवाणी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. यात न्यायमुर्ती एम. एस. लोणे यांनी, कर्मचाऱ्यांची रक्कम देण्यास असमर्थ असलेल्या बँकेचे साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहे. अवसायानात निघालेल्या भूविकास बँकेत कार्यकरत कर्मचारी सेवाशर्तीनंतर निवृत्त झालेत. असे अनेक कर्मचारी सेवानिवृत्ती रक्कम, अतिरिक्त महागाई वाढ रक्कम, रजा वेतन, पी.एफ व अन्य लाभाच्या रक्कमेपासून वंचित आहेत. यामुळे भंडारा जिल्ह्यातील ३० सप्टेंबर १९९८ ते ३१ जानेवारी २००८ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लाभासाठी बँक व्यवस्थापानाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना लाभाचा मोबादला मिळाला नाही. यामुळे शासन दरबारी उंबरठे झिझविल्यानंतर हतबल झालेल्या व्ही. एन. बोरकर, व्ही. एच. डहाके, टी. के. बांडेबुचे, एस. बी. निंबार्ते, डी. बी. हटवार, डी. एस. बांते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, तत्कालीन अध्यक्ष, त्यानंतरचे प्रशासक व विद्यमान अवसायक, शिखर बँके मुंबई व नागपूर विभागीय व्यवस्थापक यांच्याविरूध्द याचिका दाखल केली होती. याचिका दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भूविकास बँकेचे माजी जिल्हा व्यवस्थापक, लिपीक, शिपाई व अन्य प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना बँकेकडे असलेली १ कोटी ४४ लाख २१ हजार ९७७ रूपयांची थकीत रक्कम घेणे होती. नागपूर खंडपिठाने ४४ कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. यानंतर शिखर बँकेने त्यांच्या निकषानुसार केवळ आठ कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला दिला. उर्वरित ३६ कर्मचाऱ्यांना शिखर बँकेने जिल्हा विभाजनानंतरचे कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध नाही. असे म्हणत ते निकषात बसत नसल्याचे कारण सांगून शिखर बँकेने हातवर केले. याविरूध्द अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. यावर भंडारा येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एस. लोणे यांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकूण घेतली व त्यांच्या बाजूने निकाल देताना, बँकेने कर्मचाऱ्यांची १ कोटी ३६ लाखांची थकीत रक्कम देण्याचे आदेश दिले. हा निकाल न्यायमुर्ती लोणे यांनी १७ निकाली काढला. रक्कम देण्यास असमर्थ असल्यास बँकेचे साहित्य जप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्यासंदर्भात जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याचे न्यायालयाचे हे कदाचित राज्यातील पहिलेच प्रकरण असावे. या निकालामुळे बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. अरूण बावनकर यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)