शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देउद्ध्वस्त धान : कृषी आणि महसूल विभागात समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अतिशय संथगतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. आठवडाभरात केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्राचेच सर्वेक्षण झाल्याचे प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वेक्षणात समन्वय दिसत नाही. परिणामी सर्वेक्षणाला विलंब होवून शेतकºयांना मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.दिवाळीच्या सुट्टीनंतर कृषी व महसूलचे कर्मचारी सर्व्हेक्षणाच्या कामाला लागले आहे. मात्र आजही अनेक शेताच्या बांधावर सर्व्हेक्षक पोहचत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईची अपेक्षा आहे. अनेक शेतकरी मदतीकडे आस लावून बसले आहे. परंतु संथगतीने होणाºया या सर्व्हेक्षणामुळे मदतीला दीर्घकाळ लागण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आठ हजार क्षेत्रापैकी आतापर्यंत पाच हजार हेक्टरच्या आसपास सर्व्हेक्षण झाल्याचे कृषी विभाग सांगत आहे. खरे पाहता जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु योग्य सर्व्हेक्षणाअभावी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर पोहचताच ते योग्य मुल्यांकन करून नुकसानीचे क्षेत्र ठरवित आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी पुढील तीन टप्प्यातील याद्यांचा त्रास वाचविण्याच्या नादात नुकसानीचा आकडा कमी दाखवत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या समन्वयातील अभावामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.५४२ अर्जांचे पंचनामेकृषी विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १७९२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. विहित नमुन्यातील अर्जासोबत नुकसानीचे फोटोही अपलोड केले. विविध कागदपत्रांची जुडवा जुडव करून शेतकऱ्यांनी अर्ज तर सादर केले मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ ५४२ अर्जांचे पंचनामे करण्यात आले आहे. उर्वरित पंचनामे केव्हा केले जातील याबाबत कुणीही निश्चित सांगत नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस