शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देउद्ध्वस्त धान : कृषी आणि महसूल विभागात समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अतिशय संथगतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. आठवडाभरात केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्राचेच सर्वेक्षण झाल्याचे प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वेक्षणात समन्वय दिसत नाही. परिणामी सर्वेक्षणाला विलंब होवून शेतकºयांना मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.दिवाळीच्या सुट्टीनंतर कृषी व महसूलचे कर्मचारी सर्व्हेक्षणाच्या कामाला लागले आहे. मात्र आजही अनेक शेताच्या बांधावर सर्व्हेक्षक पोहचत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईची अपेक्षा आहे. अनेक शेतकरी मदतीकडे आस लावून बसले आहे. परंतु संथगतीने होणाºया या सर्व्हेक्षणामुळे मदतीला दीर्घकाळ लागण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आठ हजार क्षेत्रापैकी आतापर्यंत पाच हजार हेक्टरच्या आसपास सर्व्हेक्षण झाल्याचे कृषी विभाग सांगत आहे. खरे पाहता जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु योग्य सर्व्हेक्षणाअभावी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर पोहचताच ते योग्य मुल्यांकन करून नुकसानीचे क्षेत्र ठरवित आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी पुढील तीन टप्प्यातील याद्यांचा त्रास वाचविण्याच्या नादात नुकसानीचा आकडा कमी दाखवत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या समन्वयातील अभावामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.५४२ अर्जांचे पंचनामेकृषी विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १७९२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. विहित नमुन्यातील अर्जासोबत नुकसानीचे फोटोही अपलोड केले. विविध कागदपत्रांची जुडवा जुडव करून शेतकऱ्यांनी अर्ज तर सादर केले मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ ५४२ अर्जांचे पंचनामे करण्यात आले आहे. उर्वरित पंचनामे केव्हा केले जातील याबाबत कुणीही निश्चित सांगत नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस