शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देउद्ध्वस्त धान : कृषी आणि महसूल विभागात समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अतिशय संथगतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. आठवडाभरात केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्राचेच सर्वेक्षण झाल्याचे प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वेक्षणात समन्वय दिसत नाही. परिणामी सर्वेक्षणाला विलंब होवून शेतकºयांना मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.दिवाळीच्या सुट्टीनंतर कृषी व महसूलचे कर्मचारी सर्व्हेक्षणाच्या कामाला लागले आहे. मात्र आजही अनेक शेताच्या बांधावर सर्व्हेक्षक पोहचत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईची अपेक्षा आहे. अनेक शेतकरी मदतीकडे आस लावून बसले आहे. परंतु संथगतीने होणाºया या सर्व्हेक्षणामुळे मदतीला दीर्घकाळ लागण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आठ हजार क्षेत्रापैकी आतापर्यंत पाच हजार हेक्टरच्या आसपास सर्व्हेक्षण झाल्याचे कृषी विभाग सांगत आहे. खरे पाहता जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु योग्य सर्व्हेक्षणाअभावी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर पोहचताच ते योग्य मुल्यांकन करून नुकसानीचे क्षेत्र ठरवित आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी पुढील तीन टप्प्यातील याद्यांचा त्रास वाचविण्याच्या नादात नुकसानीचा आकडा कमी दाखवत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या समन्वयातील अभावामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.५४२ अर्जांचे पंचनामेकृषी विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १७९२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. विहित नमुन्यातील अर्जासोबत नुकसानीचे फोटोही अपलोड केले. विविध कागदपत्रांची जुडवा जुडव करून शेतकऱ्यांनी अर्ज तर सादर केले मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ ५४२ अर्जांचे पंचनामे करण्यात आले आहे. उर्वरित पंचनामे केव्हा केले जातील याबाबत कुणीही निश्चित सांगत नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस