शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

धान भरडाईत केवळ ६० टक्केच उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

मुखरू बागडे पालांदूर : भरडाई दरवाढीचा गुंता सुटत नाही तोच आता धान उताऱ्याचा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय नियमानुसार ...

मुखरू बागडे

पालांदूर : भरडाई दरवाढीचा गुंता सुटत नाही तोच आता धान उताऱ्याचा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय नियमानुसार ६७ टक्के उतारा अपेक्षित असताना यंदा केवळ ६० टक्केच उतारा हाती येत आहे. त्यामुळे मिलर्स अडचणीत येण्याची शक्यता असून भरडाईसाठी धान न उचलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत किमतीत धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या धान खरेदी अंतिम टप्प्यात आहे. २७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. गोदाम हाऊसफूल झाले आहेत. अनेक ठिकाणी खुल्या जागेत ताडपत्रीचा आधार घेऊन धान पोते ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला भरडाईचा दर वाढीवरून शेतकऱ्यांनी असहकार पुकारला होता. त्यामुळे भरडाईची आणि त्यातून गोदामाची समस्या निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडविला. मिलर्सनी भरडाईसाठी धान उचलला.

परंतु धान भरडाई करीत असताना मिलर्सला ६० टक्के उतारा येत आहे. शासनाच्या नियमानुसार १०० किलो धानापासून ६७ किलो तांदूळ देणे अपेक्षित असते. मात्र, अपेक्षित उतारा येत नसल्याने मिलर्स अडचणीत आले आहेत. नाइलाजाने त्यांना भरडाई बंद करण्याची वेळ आली आहे. ६० टक्के उताऱ्यातही ५० टक्के तांदळाचा तुकडा (खंडा) पडतो. शासनाला केवळ २५ टक्केच तुकडा अपेक्षित आहे. या सर्व प्रकारामुळे धान भरडाई पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे. वेळेत धान भरडाई झाली नाही तर उन्हाळी धान खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिलर्सना ३५ हजारांचे नुकसान

धान भरडाई करताना उचल केलेल्या धानाचा उतारा ६० टक्क्यांच्या पुढे जात नाही. असे मिलर्स संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. यातील सुमारे १२५ मिलर्सनी पहिल्या टप्प्यात धानाची उचल केली. त्यातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले. तांदळाच्या प्रति लाॅटमागे ३५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

प्रत्येक हंगामात मिलिंग टेस्ट अपेक्षित

शासनाच्या माध्यमातून भरडाईसाठी डिओ देण्यापूर्वी धानाची मिलिंग टेस्ट होणे गरजेचे आहे. ६७ टक्के उताऱ्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. प्रत्येक हंगाम सारखा नसतो. गत हंगाम धानासाठी पोषक नव्हता. मावा, तुडतुड्याने धान प्रभावित झाले. ४० किलोचा कट्टा अनेक केंद्रांवर ३५ किलो भरत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामात मिलिंग टेस्ट अपेक्षित आहे.

मिलर्सकडून लेखी स्वरूपात उताऱ्याच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली नाही. त्यांनी उचललेल्या धानाच्या प्रमाणात तांदूळ येणे सुरू आहे. तक्रार असल्यास शासनाकडून मार्गदर्शन मागवून योग्य निर्णय घेण्यात येईल.

-अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.