शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

धान भरडाईत केवळ ६० टक्केच उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

मुखरू बागडे पालांदूर : भरडाई दरवाढीचा गुंता सुटत नाही तोच आता धान उताऱ्याचा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय नियमानुसार ...

मुखरू बागडे

पालांदूर : भरडाई दरवाढीचा गुंता सुटत नाही तोच आता धान उताऱ्याचा प्रश्न पुढे आला आहे. शासकीय नियमानुसार ६७ टक्के उतारा अपेक्षित असताना यंदा केवळ ६० टक्केच उतारा हाती येत आहे. त्यामुळे मिलर्स अडचणीत येण्याची शक्यता असून भरडाईसाठी धान न उचलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत किमतीत धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या धान खरेदी अंतिम टप्प्यात आहे. २७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. गोदाम हाऊसफूल झाले आहेत. अनेक ठिकाणी खुल्या जागेत ताडपत्रीचा आधार घेऊन धान पोते ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला भरडाईचा दर वाढीवरून शेतकऱ्यांनी असहकार पुकारला होता. त्यामुळे भरडाईची आणि त्यातून गोदामाची समस्या निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडविला. मिलर्सनी भरडाईसाठी धान उचलला.

परंतु धान भरडाई करीत असताना मिलर्सला ६० टक्के उतारा येत आहे. शासनाच्या नियमानुसार १०० किलो धानापासून ६७ किलो तांदूळ देणे अपेक्षित असते. मात्र, अपेक्षित उतारा येत नसल्याने मिलर्स अडचणीत आले आहेत. नाइलाजाने त्यांना भरडाई बंद करण्याची वेळ आली आहे. ६० टक्के उताऱ्यातही ५० टक्के तांदळाचा तुकडा (खंडा) पडतो. शासनाला केवळ २५ टक्केच तुकडा अपेक्षित आहे. या सर्व प्रकारामुळे धान भरडाई पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे. वेळेत धान भरडाई झाली नाही तर उन्हाळी धान खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिलर्सना ३५ हजारांचे नुकसान

धान भरडाई करताना उचल केलेल्या धानाचा उतारा ६० टक्क्यांच्या पुढे जात नाही. असे मिलर्स संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. यातील सुमारे १२५ मिलर्सनी पहिल्या टप्प्यात धानाची उचल केली. त्यातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले. तांदळाच्या प्रति लाॅटमागे ३५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

प्रत्येक हंगामात मिलिंग टेस्ट अपेक्षित

शासनाच्या माध्यमातून भरडाईसाठी डिओ देण्यापूर्वी धानाची मिलिंग टेस्ट होणे गरजेचे आहे. ६७ टक्के उताऱ्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. प्रत्येक हंगाम सारखा नसतो. गत हंगाम धानासाठी पोषक नव्हता. मावा, तुडतुड्याने धान प्रभावित झाले. ४० किलोचा कट्टा अनेक केंद्रांवर ३५ किलो भरत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामात मिलिंग टेस्ट अपेक्षित आहे.

मिलर्सकडून लेखी स्वरूपात उताऱ्याच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली नाही. त्यांनी उचललेल्या धानाच्या प्रमाणात तांदूळ येणे सुरू आहे. तक्रार असल्यास शासनाकडून मार्गदर्शन मागवून योग्य निर्णय घेण्यात येईल.

-अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.