शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पात केवळ ४८.६९ टक्के जलसाठा; उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 07:00 IST

Nagpur News पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ४८.६९ टक्के जलसाठा आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत २३.८६ टक्के कमी

ज्ञानेश्वर मुंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ४८.६९ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २३.८६ टक्के जलसाठा कमी आहे. जोरदार पाऊस बरसला नाही तर रबी हंगामातील सिंचन आणि उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

(Only 48.69 per cent water storage in 384 projects in East Vidarbha)

पूर्व विदर्भात १६ मोठे प्रकल्प, ४२ मध्यम आणि ३२६ लघु प्रकल्प आहेत. भात शेतीसाठी या प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दरवर्षी या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा असतो. त्यामुळे रबी हंगामातही प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते; मात्र यंदा पावसाने दीर्घ विश्रांती घेतली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तर पावसाने सरासरीही गाठली नाही. परिणामी, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली नाही.

नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये २७८४.९८ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.१८ असून, गतवर्षी या प्रकल्पात ७७.३१ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत २२८.७७ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी ३१.४५ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ५८.८७ टक्के जलसाठा होता. ३२६ लघू प्रकल्पात १२८.३७ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी १९.२३ आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५७.२१ टक्के जलसाठा होता. सर्व ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत सरासरी २३.८६ जलसाठा कमी आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपात