शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:48 IST

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला.

ठळक मुद्देधरण कोरडे राहण्याची भीती : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांची वाढणार चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. धरण परिसरात आतापर्यंत ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आगामी काळात धरण कोरडे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.बावनथडी (राजीव सागर) धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांचे संयुक्त धरण आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात धरण परिसरात ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्या ३० टक्के पाण्याचा जीवंत साठा आहे. ६३ दलघमी पाणी धरणात उपलब्ध आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १६ आॅगस्टपासून धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. धरणात पाण्याची पातळी ४५० मिमी असून धरणाची पातळी ३४० मिमी इतकी आहे.धरण परिसरात व मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात पावसाचा जोर नाही. त्यामुळे यावर्षी धरण रिकामे राहण्याची शक्यता अधिक आहे. ७० टक्के धरण आजही रिकामे आहे. यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी आगामी काळात या प्रकल्पात पुरेशा पाणीसाठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण जाईल.धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हधरणाच्या सुरक्षेकरिता शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. परंतु बावनथडी धरण परिसरात व अगदी धरणातील पाण्याचा काठापर्यंत पर्यटक सहज प्रवेश करीत आहेत. धरणाच्या सुरक्षेकरिता येथे उपाययोजना केलेली दिसत नाही. मध्यप्रदेशाचा काही भाग नक्षलग्रस्त असल्याने धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य धरणाचे गेट व परिसरावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. मध्यप्रदेश शासनाचे काही कर्मचारी मुख्य गेटजवळ कर्तव्यावर दिसतात. परंतु पर्यटकांची संख्या जास्त राहत असल्याने त्यांचा येथे नाईलाज दिसतो.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पwater shortageपाणीटंचाई