शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:48 IST

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला.

ठळक मुद्देधरण कोरडे राहण्याची भीती : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांची वाढणार चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. धरण परिसरात आतापर्यंत ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आगामी काळात धरण कोरडे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.बावनथडी (राजीव सागर) धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांचे संयुक्त धरण आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात धरण परिसरात ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्या ३० टक्के पाण्याचा जीवंत साठा आहे. ६३ दलघमी पाणी धरणात उपलब्ध आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १६ आॅगस्टपासून धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. धरणात पाण्याची पातळी ४५० मिमी असून धरणाची पातळी ३४० मिमी इतकी आहे.धरण परिसरात व मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात पावसाचा जोर नाही. त्यामुळे यावर्षी धरण रिकामे राहण्याची शक्यता अधिक आहे. ७० टक्के धरण आजही रिकामे आहे. यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी आगामी काळात या प्रकल्पात पुरेशा पाणीसाठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण जाईल.धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हधरणाच्या सुरक्षेकरिता शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. परंतु बावनथडी धरण परिसरात व अगदी धरणातील पाण्याचा काठापर्यंत पर्यटक सहज प्रवेश करीत आहेत. धरणाच्या सुरक्षेकरिता येथे उपाययोजना केलेली दिसत नाही. मध्यप्रदेशाचा काही भाग नक्षलग्रस्त असल्याने धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य धरणाचे गेट व परिसरावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. मध्यप्रदेश शासनाचे काही कर्मचारी मुख्य गेटजवळ कर्तव्यावर दिसतात. परंतु पर्यटकांची संख्या जास्त राहत असल्याने त्यांचा येथे नाईलाज दिसतो.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पwater shortageपाणीटंचाई