शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:48 IST

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला.

ठळक मुद्देधरण कोरडे राहण्याची भीती : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांची वाढणार चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. धरण परिसरात आतापर्यंत ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आगामी काळात धरण कोरडे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.बावनथडी (राजीव सागर) धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांचे संयुक्त धरण आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात धरण परिसरात ६२८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्या ३० टक्के पाण्याचा जीवंत साठा आहे. ६३ दलघमी पाणी धरणात उपलब्ध आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १६ आॅगस्टपासून धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. धरणात पाण्याची पातळी ४५० मिमी असून धरणाची पातळी ३४० मिमी इतकी आहे.धरण परिसरात व मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात पावसाचा जोर नाही. त्यामुळे यावर्षी धरण रिकामे राहण्याची शक्यता अधिक आहे. ७० टक्के धरण आजही रिकामे आहे. यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी आगामी काळात या प्रकल्पात पुरेशा पाणीसाठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण जाईल.धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हधरणाच्या सुरक्षेकरिता शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. परंतु बावनथडी धरण परिसरात व अगदी धरणातील पाण्याचा काठापर्यंत पर्यटक सहज प्रवेश करीत आहेत. धरणाच्या सुरक्षेकरिता येथे उपाययोजना केलेली दिसत नाही. मध्यप्रदेशाचा काही भाग नक्षलग्रस्त असल्याने धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य धरणाचे गेट व परिसरावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. मध्यप्रदेश शासनाचे काही कर्मचारी मुख्य गेटजवळ कर्तव्यावर दिसतात. परंतु पर्यटकांची संख्या जास्त राहत असल्याने त्यांचा येथे नाईलाज दिसतो.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पwater shortageपाणीटंचाई