शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

केवळ 25 टक्के पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

यंदाच्या खरिपात तालुक्यातील २६ हजार २६५ शेतक-यांनी जवळपास १३ हजार ६०० हे. क्षेत्रातील धान पिकासाठी पिक विमा काढल्याची माहिती आहे. दरम्यान यंदाच्या खरिपात पुरपरिस्थितिमूळे तालुक्यात ८ हजार ७५३ हे. क्षेत्रातील पिकांचे नुकसान होतांना ४२ शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे. यासबंध परिस्थितीत विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के विमा लागू केल्याने शेतक-यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्दे‘मिड सीज़न अडव्हरसिटी’ चा फटका : शेतकऱ्यांमध्ये असंतोष

  दयाल भोवते    लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात निर्माण झालेली पुरपरिस्थीती व तुडतुडा किडरोगासह परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने ‘मिड सीज़न अडव्हरसिटी’ लागू करीत नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के पिक विम्याचा लाभ दिला जात असल्याने क्षतीग्रस्त शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.माहिती नुसार , यंदाच्या खरिपात लाखांदूर तालुक्यातील भागडी, लाखांदूर व विरली(बू) या तीन मंडळांतर्गत पुरपरिस्थीती तुडतुडा व परतीच्या पावसाने जवळपास ८ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रातील पिक हानी झाली होती. सदर हानीची दखल घेत शासनाने नुकसानग्रास्त भागाची पाहणी व पंचनामे करुन ५० टक्के पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला. मात्र विमा कंपनीने ‘मिड सीज़न अडव्हरसीटी’ च्या नियमानुसार हंगामाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षीत उत्पादनामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाइच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते.त्यानुसार यंदाच्या खरिपात तालुक्यातील २६ हजार २६५ शेतक-यांनी जवळपास १३ हजार ६०० हे. क्षेत्रातील धान पिकासाठी पिक विमा काढल्याची माहिती आहे. दरम्यान यंदाच्या खरिपात पुरपरिस्थितिमूळे तालुक्यात ८ हजार ७५३ हे. क्षेत्रातील पिकांचे नुकसान होतांना ४२ शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे. यासबंध परिस्थितीत विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के विमा लागू केल्याने शेतक-यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.तथापि शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रधानमंत्री पिक योजनेंतर्गत विम्याचा लाभ उत्पादन क्षेत्राच्या प्रमाणात विम्याचा लाभ दिला जाणार या गैरसमजाने विमा काढल्याची चर्चा आहे. मात्र विमा कंपनीने उन्बरठा उत्पादन व अपेक्षीत उत्पादनाच्या नुकसानिच्या २५ टक्के प्रमाणात विमा रकमेचे वाटप सुरु केल्याने शेतकऱ्यात नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक विमाधारक शेतक-यांना हेक्टरी ७०० ते ७५० रु. विम्याची आगाऊ रक्कम उपलब्ध केली जात असल्याने निर्धारित विमा रकमेच्या एक तृत्यांश रक्कम असल्याचा आरोप शेतक-यांत केला जात आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवुन ‘मिड सीज़न अडव्हरसीटी‘ च्या नावाखाली विमा कंपनी कडून शेतक-यांची झालेली घोर निराशा दुर करन्याहेतू आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी जनतेत केली जात आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा