शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

केवळ 25 टक्के पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

यंदाच्या खरिपात तालुक्यातील २६ हजार २६५ शेतक-यांनी जवळपास १३ हजार ६०० हे. क्षेत्रातील धान पिकासाठी पिक विमा काढल्याची माहिती आहे. दरम्यान यंदाच्या खरिपात पुरपरिस्थितिमूळे तालुक्यात ८ हजार ७५३ हे. क्षेत्रातील पिकांचे नुकसान होतांना ४२ शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे. यासबंध परिस्थितीत विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के विमा लागू केल्याने शेतक-यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्दे‘मिड सीज़न अडव्हरसिटी’ चा फटका : शेतकऱ्यांमध्ये असंतोष

  दयाल भोवते    लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात निर्माण झालेली पुरपरिस्थीती व तुडतुडा किडरोगासह परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने ‘मिड सीज़न अडव्हरसिटी’ लागू करीत नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के पिक विम्याचा लाभ दिला जात असल्याने क्षतीग्रस्त शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.माहिती नुसार , यंदाच्या खरिपात लाखांदूर तालुक्यातील भागडी, लाखांदूर व विरली(बू) या तीन मंडळांतर्गत पुरपरिस्थीती तुडतुडा व परतीच्या पावसाने जवळपास ८ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रातील पिक हानी झाली होती. सदर हानीची दखल घेत शासनाने नुकसानग्रास्त भागाची पाहणी व पंचनामे करुन ५० टक्के पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला. मात्र विमा कंपनीने ‘मिड सीज़न अडव्हरसीटी’ च्या नियमानुसार हंगामाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षीत उत्पादनामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाइच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते.त्यानुसार यंदाच्या खरिपात तालुक्यातील २६ हजार २६५ शेतक-यांनी जवळपास १३ हजार ६०० हे. क्षेत्रातील धान पिकासाठी पिक विमा काढल्याची माहिती आहे. दरम्यान यंदाच्या खरिपात पुरपरिस्थितिमूळे तालुक्यात ८ हजार ७५३ हे. क्षेत्रातील पिकांचे नुकसान होतांना ४२ शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे. यासबंध परिस्थितीत विमा कंपनीने नुकसानीचे प्रमाणात २५ टक्के विमा लागू केल्याने शेतक-यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे.तथापि शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रधानमंत्री पिक योजनेंतर्गत विम्याचा लाभ उत्पादन क्षेत्राच्या प्रमाणात विम्याचा लाभ दिला जाणार या गैरसमजाने विमा काढल्याची चर्चा आहे. मात्र विमा कंपनीने उन्बरठा उत्पादन व अपेक्षीत उत्पादनाच्या नुकसानिच्या २५ टक्के प्रमाणात विमा रकमेचे वाटप सुरु केल्याने शेतकऱ्यात नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक विमाधारक शेतक-यांना हेक्टरी ७०० ते ७५० रु. विम्याची आगाऊ रक्कम उपलब्ध केली जात असल्याने निर्धारित विमा रकमेच्या एक तृत्यांश रक्कम असल्याचा आरोप शेतक-यांत केला जात आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवुन ‘मिड सीज़न अडव्हरसीटी‘ च्या नावाखाली विमा कंपनी कडून शेतक-यांची झालेली घोर निराशा दुर करन्याहेतू आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी जनतेत केली जात आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा