शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

साकोली तालुक्यात केवळ २५ टक्के भात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:24 IST

साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.

ठळक मुद्देसिंचन सुविधेचा अभाव : लॉकडाऊनने शेतकरी आर्थिक टंचाईत, दोन्ही प्रकल्प ठरले पांढरा हत्ती

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोना महासंकटाने यंदा साकोली तालुक्यातील रोवणी रखडली आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच रोवणीचे काम आटोपले आहे. सिंचनाच्या सुविधेचा अभाव आणि आर्थिक टंचाईमुळे उर्वरित रोवणी कधी पूर्ण होईल, असा प्रश्न आहे. तर तालुक्यातील दोन प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.गतवर्षी सुरूवातीला पाऊस आला आणि नंतर अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फसका बसला. यावर्षी तसेच होवू नये म्हणून शेतकरी सावध पवित्रा घेत आहे. आधीच कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. बि-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक विवंचना अद्यापही आहे. धान विक्रीचे पैसेही शेतकऱ्यांना उशिरा मिळाले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.आठ तास वीज पुरवठासध्या पावसाने दडी मारली आहे. रोवणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी लगबग वाढली आहे. अनेक शेतकºयांनी सिंचनासाठी आपल्या शेतात विहिरी, बोरवेल खोदून सोय उपलब्ध केली. परंतु वीज पुरवठ्याचा अडसर कायम आहे. शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणामही रोवणीवर होत आहे. १६ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तसेच कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचीही मागणी होवू लागली आहे. अनेक शेतकरी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडले आहे.दोन्ही सिंचन प्रकल्प अपूर्णसाकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम जवळपास २० वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाचे बहुतेक काम पूर्ण झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. दुसरा प्रकल्प वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्प होय. याप्रकल्पाचे काम २५ वर्षापुर्वी करण्यात आले होते. मात्र २५ टक्के काम शिल्लक असताना हा प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडला. तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणत्याच हालचाली दिसत नाही.साकोली तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कुठेही खताची टंचाई नाही. शेतकºयांना काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा.-सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी, साकोली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस