शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

साकोली तालुक्यात केवळ २५ टक्के भात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:24 IST

साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.

ठळक मुद्देसिंचन सुविधेचा अभाव : लॉकडाऊनने शेतकरी आर्थिक टंचाईत, दोन्ही प्रकल्प ठरले पांढरा हत्ती

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोना महासंकटाने यंदा साकोली तालुक्यातील रोवणी रखडली आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच रोवणीचे काम आटोपले आहे. सिंचनाच्या सुविधेचा अभाव आणि आर्थिक टंचाईमुळे उर्वरित रोवणी कधी पूर्ण होईल, असा प्रश्न आहे. तर तालुक्यातील दोन प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.गतवर्षी सुरूवातीला पाऊस आला आणि नंतर अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फसका बसला. यावर्षी तसेच होवू नये म्हणून शेतकरी सावध पवित्रा घेत आहे. आधीच कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. बि-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक विवंचना अद्यापही आहे. धान विक्रीचे पैसेही शेतकऱ्यांना उशिरा मिळाले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.आठ तास वीज पुरवठासध्या पावसाने दडी मारली आहे. रोवणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी लगबग वाढली आहे. अनेक शेतकºयांनी सिंचनासाठी आपल्या शेतात विहिरी, बोरवेल खोदून सोय उपलब्ध केली. परंतु वीज पुरवठ्याचा अडसर कायम आहे. शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणामही रोवणीवर होत आहे. १६ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तसेच कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचीही मागणी होवू लागली आहे. अनेक शेतकरी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडले आहे.दोन्ही सिंचन प्रकल्प अपूर्णसाकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम जवळपास २० वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाचे बहुतेक काम पूर्ण झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. दुसरा प्रकल्प वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्प होय. याप्रकल्पाचे काम २५ वर्षापुर्वी करण्यात आले होते. मात्र २५ टक्के काम शिल्लक असताना हा प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडला. तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणत्याच हालचाली दिसत नाही.साकोली तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कुठेही खताची टंचाई नाही. शेतकºयांना काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा.-सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी, साकोली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस