शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

साकोली तालुक्यात केवळ २५ टक्के भात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:24 IST

साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.

ठळक मुद्देसिंचन सुविधेचा अभाव : लॉकडाऊनने शेतकरी आर्थिक टंचाईत, दोन्ही प्रकल्प ठरले पांढरा हत्ती

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोना महासंकटाने यंदा साकोली तालुक्यातील रोवणी रखडली आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच रोवणीचे काम आटोपले आहे. सिंचनाच्या सुविधेचा अभाव आणि आर्थिक टंचाईमुळे उर्वरित रोवणी कधी पूर्ण होईल, असा प्रश्न आहे. तर तालुक्यातील दोन प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.गतवर्षी सुरूवातीला पाऊस आला आणि नंतर अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फसका बसला. यावर्षी तसेच होवू नये म्हणून शेतकरी सावध पवित्रा घेत आहे. आधीच कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. बि-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक विवंचना अद्यापही आहे. धान विक्रीचे पैसेही शेतकऱ्यांना उशिरा मिळाले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.आठ तास वीज पुरवठासध्या पावसाने दडी मारली आहे. रोवणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी लगबग वाढली आहे. अनेक शेतकºयांनी सिंचनासाठी आपल्या शेतात विहिरी, बोरवेल खोदून सोय उपलब्ध केली. परंतु वीज पुरवठ्याचा अडसर कायम आहे. शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणामही रोवणीवर होत आहे. १६ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तसेच कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचीही मागणी होवू लागली आहे. अनेक शेतकरी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडले आहे.दोन्ही सिंचन प्रकल्प अपूर्णसाकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम जवळपास २० वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाचे बहुतेक काम पूर्ण झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. दुसरा प्रकल्प वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्प होय. याप्रकल्पाचे काम २५ वर्षापुर्वी करण्यात आले होते. मात्र २५ टक्के काम शिल्लक असताना हा प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडला. तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणत्याच हालचाली दिसत नाही.साकोली तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कुठेही खताची टंचाई नाही. शेतकºयांना काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा.-सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी, साकोली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस