गाठली सत्तरी : गृहिणींच्या डोळ्यात पाणीतुमसर : पूर्वी १०० रूपयांची नोट मोडली की पिशवी भरून भाजीपाला घरी आणता येत होते. मात्र आताच्या महागाईच्या काळात ते सर्व मागेच सरले असतानाच आता कांद्याने तर सगळ्यांचाच वांदा करून टाकला.सर्व सामान्यांना हा कांदा चांगलाच झोंबु लागला असून गृहणीच्या डोळ्यात तर त्याने पाणी आणले. त्यामुळे हा कांदा स्वयंपाक घरातून हद्दपार होतो की काय अशी भिती वाटु लागली आहे. सत्तरीकडे गेलेला हा कांदा शंभरी तर पार करणार नाही ना याची सर्व सामान्यांना धास्ती भरली आहे. दरम्यान या कांद्याच्या दरवाढीने ज्या व्यापाऱ्यांनी कांदा स्टॉक करून ठेवले होते ते व्यापारी मात्र मालामाल झाले आहेत.निसर्गचक्राचा बदलाचा फटका सर्वच पिकांच्या उत्पादनावर बसला आहे. त्यात आणखी भर म्हणून यावर्षीचा कोरडा पावसाळा मृग नक्षत्राला पावसाच्या हजेरीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोवणी होते नव्हते त्या पाण्याने व मिळेल त्या पाण्याने लावली मात्र पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानाचे पिक जगविणे जिकरीचे झाले तर काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाअभावी आपल्या शेतजमिनी पडीतच ठेवल्या आहे, अशी विदारक स्थिती तुमसर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. हिच स्थिती सर्व प्रकारच्या पिक उत्पादनावर ओढविली असल्याने प्रती ७ ते १० रूपये किलो अशा तुटपुंज्या दरात मिळणारा कांदाही सत्तरी गाढल्याने सर्वसामान्याचे घर खर्चाचे बजेड बिघडले असून आता हळूहळू स्वयंपाक घरातून कांदा हद्दपार होत चालला आहे. (शहर प्रतिनिधी )
कांद्याने केलाय सर्वसामान्यांचा ‘वांदा’
By admin | Updated: August 26, 2015 00:24 IST