शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शाळा एक, भरते तीन ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:07 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते.

ठळक मुद्देपिलांद्रीची शाळा । चार महिन्यापासून शाळेचे छत नाही

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. शाळा एक असली तरी वर्ग मात्र तीन ठिकाणी भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. वर्गखोलीचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी पिलांद्री येथील पालकांनी केली आहे.पवनी तालुक्यातील पिलांद्री येथील शाळा परिसरात नावाजलेली होती. परंतु १९६६ मध्ये बांधलेली ही शाळा आता जीर्ण झाली आहे. डागडुजीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली. त्यातच चार महिन्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली छत काढण्यात आले. परंतु पावसाळा सुरु झाला तरी छत टाकण्यासाठी मुहूर्त झाला नाही. त्यामुळे शाळा एक असली तरी तीन ठिकाणी भरविली जात आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृहाचाही अभाव आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी घर गाठावे लागते. १२० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेत ज्ञानार्जन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शाळेत एक संगणक असून या कक्षातही विद्यार्थ्यांना बसविण्याशिवाय पर्याय नाही.या शाळेची इमारत तीन वर्षापासून आहे त्या अवस्थेत आहे. प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. क्रीडांगण नाही. परिपाठासाठी एक खोली आहे. त्या खोलीत १२० विद्यार्थी कसेबसे बसतात. या सर्व प्रकारामुळे विद्याथ् र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जीर्ण झालेल्या शाळेत अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वर्गखोलीचे तात्काळ बांधकाम करावे अशी मागणी सरपंच भारती मडावी व गावकऱ्यांनी केली आहे.अपघाताची भीतीशाळेच्या जीर्ण इमारतीत १२० विद्यार्थी शिकतात. या शाळेचे छत काढून ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या भींतीही खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची कायम भीती असते. विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत घेऊन येथे ज्ञानार्जन करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन या शाळा इमारतीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.भौतिक सुविधा विषयींचा अहवाल आपण दरवर्षी जिल्हा परिषदेला पाठवितो. दुरुस्तीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या वतीने शाळांची निवड करून केली जाते.-एन.टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी, पवनी.

टॅग्स :Schoolशाळा