शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशयाचा एक मीटरने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपाणीटंचाई: पाणी सोडण्यासाठी आमदारांचे पत्र, जलकुंभात साठवणूक करणार

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.चांदपूर गावात असणाºया विहिरी एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या आहेत. जलकुंभाशेजारी असणारा सौर उर्जेवरील पंपगृह बंद पडला आहे. यामुळे पाणी टंचाईच्या संकटात भर पडली आहे. या जलकुंभातून गावकरी, जागृत हनुमान देवस्थानात दाखल होणारे भाविक तथा वन विभागाचे नर्सरीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु टाकीतील पाणी आटल्याने नर्सरीतील कोट्यवधींचे रोपवन कोमेजण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जलाशयाच्या गावातच पाण्याचा गंभीर संकट निर्माण झाला आहे. जलाशयाचे पाणी विसर्ग करण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. परंतु पाण्याचा विसर्ग करतांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जात आहे. यंदा उन्हाळी धान पिकांना पाण्याचे वाटप नाकारण्यात आले आहे. यामुळे जलाशयात १८ फुट पाण्याची शिल्लक साठवणूक आहे. या पाण्याचा उपयोग आता नागरिकांना पिण्याच्या कार्याकरिता येणार आहे. चांदपूर गावात निर्माण झालेली पाणी टंचाई निवारण्यासाठी आमदार चरण वाघमारे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे.याशिवाय सरपंच उर्मिला हेमराज लांजे आणि वन विभागाने पत्रातून पाणी सोडण्याचे पत्र दिले. चादंपूर जलाशयाचे एक मीटरने दरवाजा उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. विसर्ग होणारे पाणी टाकीत साठवणूक केले जाणार आहे. या पाण्याचे शुल्क तिन्ही विभागाकडून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत, देवस्थान आणि वन विभाग यांचेकडून राशी वसुली केली जाणार आहे. या पाण्याची वसुली ७० हजार रुपयांचे घरात असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकी २२ हजार रुपये अशी वसुली येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्याचे विभागणी अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.चांदपूर गावात विहिरी आटल्या असल्याने जलाशयाचे पाणी सोडण्याचे पत्र दिले आहे. निधी प्राप्त होताच पाण्याची राशी दिली जाईल.- उर्मिला लंजे,सरपंच, चांदपूरजलाशयाचे पाणी जलकुंभात विसर्ग करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. या पाण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. विसर्गानुसार शुल्काची आकारणी करण्यात येईल.- एन. जे. मिरत,शाखा अभियंता, सिहोराबावनथडी, वैनगंगा नद्यांचे पात्र आटलेसिहोरा परिसरातील बावनथडी नदीचे पात्र पुर्णत: आटले असल्याने परिसरातील तथा मध्यप्रदेशातील नद्यांचे काठावरील गावात पाणी टंचाईची झळ सुरु झाली आहे. या नदी पात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी सुरु झाली आहे. वैनगंगा नदीवर धरण असले तरी या धरणात अल्प जलसाठा आहे. यामुळे नळयोजना अडचणीत आलेल्या आहेत. शेतशिवारात असणाऱ्या विहिरींची पातळी खोलवर गेली असल्याने उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करणे शेतकऱ्यांना जीकरीचे ठरत आहे. पिण्याचे पाणी तथा शेती सिंचित करण्यासाठी थ्री फेज वीज पुरवठा १६ तासांचे करण्याची मागणी गावात नागरिक करित आहेत.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय