शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

चांदपूर जलाशयाचा एक मीटरने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपाणीटंचाई: पाणी सोडण्यासाठी आमदारांचे पत्र, जलकुंभात साठवणूक करणार

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.चांदपूर गावात असणाºया विहिरी एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या आहेत. जलकुंभाशेजारी असणारा सौर उर्जेवरील पंपगृह बंद पडला आहे. यामुळे पाणी टंचाईच्या संकटात भर पडली आहे. या जलकुंभातून गावकरी, जागृत हनुमान देवस्थानात दाखल होणारे भाविक तथा वन विभागाचे नर्सरीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु टाकीतील पाणी आटल्याने नर्सरीतील कोट्यवधींचे रोपवन कोमेजण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जलाशयाच्या गावातच पाण्याचा गंभीर संकट निर्माण झाला आहे. जलाशयाचे पाणी विसर्ग करण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. परंतु पाण्याचा विसर्ग करतांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जात आहे. यंदा उन्हाळी धान पिकांना पाण्याचे वाटप नाकारण्यात आले आहे. यामुळे जलाशयात १८ फुट पाण्याची शिल्लक साठवणूक आहे. या पाण्याचा उपयोग आता नागरिकांना पिण्याच्या कार्याकरिता येणार आहे. चांदपूर गावात निर्माण झालेली पाणी टंचाई निवारण्यासाठी आमदार चरण वाघमारे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे.याशिवाय सरपंच उर्मिला हेमराज लांजे आणि वन विभागाने पत्रातून पाणी सोडण्याचे पत्र दिले. चादंपूर जलाशयाचे एक मीटरने दरवाजा उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. विसर्ग होणारे पाणी टाकीत साठवणूक केले जाणार आहे. या पाण्याचे शुल्क तिन्ही विभागाकडून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत, देवस्थान आणि वन विभाग यांचेकडून राशी वसुली केली जाणार आहे. या पाण्याची वसुली ७० हजार रुपयांचे घरात असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकी २२ हजार रुपये अशी वसुली येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्याचे विभागणी अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.चांदपूर गावात विहिरी आटल्या असल्याने जलाशयाचे पाणी सोडण्याचे पत्र दिले आहे. निधी प्राप्त होताच पाण्याची राशी दिली जाईल.- उर्मिला लंजे,सरपंच, चांदपूरजलाशयाचे पाणी जलकुंभात विसर्ग करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. या पाण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. विसर्गानुसार शुल्काची आकारणी करण्यात येईल.- एन. जे. मिरत,शाखा अभियंता, सिहोराबावनथडी, वैनगंगा नद्यांचे पात्र आटलेसिहोरा परिसरातील बावनथडी नदीचे पात्र पुर्णत: आटले असल्याने परिसरातील तथा मध्यप्रदेशातील नद्यांचे काठावरील गावात पाणी टंचाईची झळ सुरु झाली आहे. या नदी पात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी सुरु झाली आहे. वैनगंगा नदीवर धरण असले तरी या धरणात अल्प जलसाठा आहे. यामुळे नळयोजना अडचणीत आलेल्या आहेत. शेतशिवारात असणाऱ्या विहिरींची पातळी खोलवर गेली असल्याने उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करणे शेतकऱ्यांना जीकरीचे ठरत आहे. पिण्याचे पाणी तथा शेती सिंचित करण्यासाठी थ्री फेज वीज पुरवठा १६ तासांचे करण्याची मागणी गावात नागरिक करित आहेत.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय