शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

दीड तास ‘ट्रॉफिक जाम’

By admin | Updated: June 15, 2014 23:21 IST

वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अनियोजन तथा पार्किंगच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. शहराच्या हृदयस्थळी दर रविवारी भरणाऱ्या बाजार परिसराच्या मुख्य

नागरिक संतप्त : मुख्य मार्ग ठरला अडचणीचा, वाहतूक पोलीस बनले मूकदर्शकभंडारा : वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अनियोजन तथा पार्किंगच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. शहराच्या हृदयस्थळी दर रविवारी भरणाऱ्या बाजार परिसराच्या मुख्य मार्गावर ट्रॉफीक जाम होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज सायंकाळी ५ वाजतापर्यंत ते ६.४५ पर्यंत मुख्य मार्गावर ट्रॉफीक जाम असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. दुसरीकडे वाहतूक पोलिसांची कमान सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला. सव्वा लक्ष नागरिकांची वसाहत असलेल्या भंडारा शहरात कुठेही पार्कींगची व्यवस्था नाही. शास्त्री चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण व तेवढाच दाट रहदारीचा समजला जातो. असंख्य दुकाने, फुटपाथ दुकानदार याच्यासह खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी, पोलीस ठाणे, बँका, पोस्ट आॅफीस व बसस्थानक याच मार्गावर आहेत. त्यामुळे अत्यंत वर्दळ पाहायला मिळते. रविवारी मुख्य बाजार तर बुधवारी मिनी बाजार भरतो. पोस्ट आॅफीस चौक ते संत तुकडोजी मार्गापर्यंतच्या रस्त्यावर बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी असते. दुकानांसमोर पार्किंग नसल्याने नागरिक रस्त्यावरच मनमर्जीने वाहने ठेवतात.दुकानदारांचेही अतिक्रमणमुख्य मार्गावर लहान सहान दुकानदारांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. नझूलची नालीही अतिक्रमणातून सुटलेली नाही. अतिक्रमणाची कारवाई केल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे अशीच पाहावयास मिळते. अतिक्रमणाच्या मुद्यावर बळजबरी व मुजोरीपणा वाहतूक समस्येच्या रुपाने नागरिकांसमोर येत आहे. पोलीस अधीक्षक लक्ष देणार काय?जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस विभागाचे सेनापती या समस्येकडे लक्ष देणार काय? असा खडा सवाल आहे. वाहतूक पोलीस खरेच नियोजन करीत नाहीत काय? महसूल प्रशासन यावर तोडगा काढण्याचा विचारही करीत नाहीत काय? असा सवालही यावेळी उपस्थित होत आहे. दोन दशकापासूनची ही समस्या एका दिवसात सुटणारी नसणारी तरी जिल्हा पोलीस अधीक्षकाना आव्हान देणारी आहे.एकेरी वाहतूकीचाही बोजवारासन २००७ मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर यांनी गांधी चौक ते बसस्थानक मार्गापर्यंतची वाहतूक व्यवस्था एकेरी राहील असे नियोजन केले होते. काही दिवस हा फंडा चांगला राबला. मात्र अतिक्रमणाचा मुद्दा व पार्कींगचा अभाव यामुळे सद्यस्थितीत या व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक व्यवस्थाही कुचकामी ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)