शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अधिकाऱ्यांनी प्रामाणिक जनसेवा करावी

By admin | Updated: September 14, 2015 00:22 IST

असंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाज तत्परतेने करीत असतांना काही अधिकाऱ्यांबाबत जनमानसात नकारात्मक भावना दिसून येतात.

समीर भाटकर : राजपत्रित अधिकाऱ्यांची सभा, बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटपगोंदिया : असंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाज तत्परतेने करीत असतांना काही अधिकाऱ्यांबाबत जनमानसात नकारात्मक भावना दिसून येतात. काही अधिकारी त्यांच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांना आस्थेवाईकपणे मार्गदर्शन करीत नाही. अधिकाऱ्यांनी प्रामाणिक जनसेवा करावी, असे आवाहन राजपत्रीत अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी (दि.१०) आयोजित राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी एन.के.लोणकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेला महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद रक्षमवार व डॉ. संदीप इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, कार्यसंस्कृती अभियानानंतरचे पुढचे पाऊल विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासनासाठी पगारात भागवा हे अभियान राबविण्यात येत आहे. काही अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडल्याने अशा घटनांमुळेच सर्वच अधिकारी भ्रष्टाचारी असल्याची वाईट प्रतिमा जनमानसांत तयार झाली आहे. ही प्रतिमा महासंघाच्या प्रतिमेस काळवंडणारी आहे. त्यामुळे महासंघाने ‘पगारात भागवा’ हे अभियान जाणिवपूर्वक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पगारात भागवा याचा अर्थ हव्यास टाळा, कोणताही मोह न धरता आपले जीवन यशस्वी व अर्थपूर्ण करता येते. भ्रष्टाचार संपविण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने हे अभियान अंगिकारले आहे, असे त्यांनी सांगितले. तर राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनातील जे घटक वाममार्गाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करीत असतील तर संबंधित विभागाकडे निर्भीडपणे त्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही भाटकर यांनी याप्रसंगी केले. सभेला कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, विभागीय वन अधिकारी कातुरे, सहायक वनसंरक्षक अश्विन ठक्कर, डॉ. श्रीरामे, डॉ. कोटांगले यांचेसह विविध विभागाचे राजपत्रित अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रमुख मागण्या राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य शासनाकडून काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे व भारतीय प्रशासनीक सेवांप्रमाणे ६० वर्ष करणे, १ जानेवारी २०१५ पासून केंद्राप्रमाणे ६ टक्के महागाई भत्ता वाढ, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील रु. ५४०० च्या ग्रेड पेची मर्यादा काढणे, महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा, प्रशंसनीय कामाबद्दल १ जानेवारी २००६ पासून आगाऊ वेतनवाढी, मानवी निलंबन कार्यपद्धती बंद करण्यात यावी, अन्याय दूर करण्यासाठी उपलब्ध असलेली मॅट यंत्रणा रद्द करू नये, सर्व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता, केंद्राप्रमाणे वाहतुक भत्ता, शैक्षणिक भत्ता, होस्टेल भत्ता राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळावा, नवीन पेंशन योजना अथवा जुनी पेंशन योजना यापैकी पर्याय देण्याची सुविधा, सातवा वेतन आयोग येण्यापूर्वी विद्यमान वेतन त्रुटी दूर करणे, संघटनांना आवश्यक शासन सुविधा व कर्मचारी-अधिकारी संघटना कार्यालयासाठी दर्शविण्यात आलेली मागील थकबाकी रद्द करणे, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नेमणे, कल्याण केंद्रासाठी मंजूर झालेला १० कोटींचा निधी लवकर मिळणे, मंत्रालयातील नगरविकास विभागामध्ये बाहेरून भरती करण्यात येऊ नये, चौकशीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन होऊ नये आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहानी संदर्भात परिणामकारक कायदा तयार करणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याची माहिती सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली.