शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांची शिजली 'डाळ'!

By admin | Updated: November 27, 2015 00:44 IST

तूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले.

अन्न पुरवठा विभागातील प्रकार : भरारी पथकांच्या दौऱ्यावर हजारोंचा खर्च व्यर्थप्रशांत देसाई भंडारातूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. यासाठी पथकावर हजारो रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारवाईत एक किलोही डाळ सापडली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर मात्र स्वत:ची ‘डाळ’ शिजविल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.भाजपने सत्ता स्थापनेपूर्वी मतदारांना ‘अच्छे दिन’ येणार असे आश्वासन देऊन केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, काही दिवसांच्या कालावधीनंतर सर्वच वस्तूंचे दर वाढत चालले आहे. यात गरिबांच्या रोजच्या जीवनातील तूर डाळीचाही समावेश आहे. कधी नव्हे ते, यावर्षी डाळ २०० रूपये किलोपर्यंत वाढली. यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारविरूध्द संतापाची लाट उसळली. यामुळे तूर डाळीची साठेबाजी करण्यामुळे दरवाढ झाली, असा समज करुन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राज्यातील साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले.दस्तूरखुद्द मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या सचिवांचे भंडारा येथील अन्न पुरवठा विभागात आदेश धडकताच अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी अनिल बन्सोडे यांनी भरारी पथक तयार केले. भंडारा येथे एक पथक तर तालुक्यात स्थानिक तहसील कार्यालयातील याप्रमाणे जिल्ह्यात सात पथक स्थापन करण्यात आले. दरम्यान, या पथकाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. अनेक ठिकाणी साठेबाजी असल्याचे या पथकाला आढळून आले. मात्र, त्यांच्याकडून कारवाईचा फार्स ठरला. दरम्यान प्रशासकीय कारभाराने त्रस्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विभागाचे सचिव दीपक कपूर यांना चांगलेच धारेवर धरून कारवाईचा अहवाल तातडीने मागून कामात पारदर्शकता आणण्याचे निर्देश दिले. ज्याठिकाणी काही अर्थपूर्ण व्यवहार झाले नाही, अशाठिकाणी या पथकाने व्यापाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रकारही समोर आले आहे. एकूणच या पथकांवर शासनाने हजारो रूपयांचा खर्च केला. कारवाईत एक किलोच्याही डाळीची साठेबाजी पथकाला आढळून आली नाही, हाच संशोधनाचा विषय आहे.धाडी टाकल्या मात्र कारवाई शून्यभंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी येथील काही व्यापारी डाळीची विक्री करण्यात पुढारले आहेत. लगतच्या मध्यप्रदेशातून जिल्ह्यात डाळ विक्रीसाठी आणली जाते. डाळीच्या किंमतीत वाढ झाल्याने दिवाळीचे महत्त्व ओळखून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी यात हात ओले केल्याने ‘आॅल इज वेल’ म्हणून हात वर केल्याची चर्चा आहे.