शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांची शिजली 'डाळ'!

By admin | Updated: November 27, 2015 00:44 IST

तूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले.

अन्न पुरवठा विभागातील प्रकार : भरारी पथकांच्या दौऱ्यावर हजारोंचा खर्च व्यर्थप्रशांत देसाई भंडारातूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. यासाठी पथकावर हजारो रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारवाईत एक किलोही डाळ सापडली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर मात्र स्वत:ची ‘डाळ’ शिजविल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.भाजपने सत्ता स्थापनेपूर्वी मतदारांना ‘अच्छे दिन’ येणार असे आश्वासन देऊन केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, काही दिवसांच्या कालावधीनंतर सर्वच वस्तूंचे दर वाढत चालले आहे. यात गरिबांच्या रोजच्या जीवनातील तूर डाळीचाही समावेश आहे. कधी नव्हे ते, यावर्षी डाळ २०० रूपये किलोपर्यंत वाढली. यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारविरूध्द संतापाची लाट उसळली. यामुळे तूर डाळीची साठेबाजी करण्यामुळे दरवाढ झाली, असा समज करुन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राज्यातील साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले.दस्तूरखुद्द मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या सचिवांचे भंडारा येथील अन्न पुरवठा विभागात आदेश धडकताच अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी अनिल बन्सोडे यांनी भरारी पथक तयार केले. भंडारा येथे एक पथक तर तालुक्यात स्थानिक तहसील कार्यालयातील याप्रमाणे जिल्ह्यात सात पथक स्थापन करण्यात आले. दरम्यान, या पथकाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. अनेक ठिकाणी साठेबाजी असल्याचे या पथकाला आढळून आले. मात्र, त्यांच्याकडून कारवाईचा फार्स ठरला. दरम्यान प्रशासकीय कारभाराने त्रस्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विभागाचे सचिव दीपक कपूर यांना चांगलेच धारेवर धरून कारवाईचा अहवाल तातडीने मागून कामात पारदर्शकता आणण्याचे निर्देश दिले. ज्याठिकाणी काही अर्थपूर्ण व्यवहार झाले नाही, अशाठिकाणी या पथकाने व्यापाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रकारही समोर आले आहे. एकूणच या पथकांवर शासनाने हजारो रूपयांचा खर्च केला. कारवाईत एक किलोच्याही डाळीची साठेबाजी पथकाला आढळून आली नाही, हाच संशोधनाचा विषय आहे.धाडी टाकल्या मात्र कारवाई शून्यभंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी येथील काही व्यापारी डाळीची विक्री करण्यात पुढारले आहेत. लगतच्या मध्यप्रदेशातून जिल्ह्यात डाळ विक्रीसाठी आणली जाते. डाळीच्या किंमतीत वाढ झाल्याने दिवाळीचे महत्त्व ओळखून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी यात हात ओले केल्याने ‘आॅल इज वेल’ म्हणून हात वर केल्याची चर्चा आहे.