शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांची शिजली 'डाळ'!

By admin | Updated: November 27, 2015 00:44 IST

तूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले.

अन्न पुरवठा विभागातील प्रकार : भरारी पथकांच्या दौऱ्यावर हजारोंचा खर्च व्यर्थप्रशांत देसाई भंडारातूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने राज्यातील साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. भंडारा जिल्ह्यातही अन्न पुरवठा विभागाच्यावतीने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. यासाठी पथकावर हजारो रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारवाईत एक किलोही डाळ सापडली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर मात्र स्वत:ची ‘डाळ’ शिजविल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.भाजपने सत्ता स्थापनेपूर्वी मतदारांना ‘अच्छे दिन’ येणार असे आश्वासन देऊन केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, काही दिवसांच्या कालावधीनंतर सर्वच वस्तूंचे दर वाढत चालले आहे. यात गरिबांच्या रोजच्या जीवनातील तूर डाळीचाही समावेश आहे. कधी नव्हे ते, यावर्षी डाळ २०० रूपये किलोपर्यंत वाढली. यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारविरूध्द संतापाची लाट उसळली. यामुळे तूर डाळीची साठेबाजी करण्यामुळे दरवाढ झाली, असा समज करुन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राज्यातील साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले.दस्तूरखुद्द मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्याच्या सचिवांचे भंडारा येथील अन्न पुरवठा विभागात आदेश धडकताच अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी अनिल बन्सोडे यांनी भरारी पथक तयार केले. भंडारा येथे एक पथक तर तालुक्यात स्थानिक तहसील कार्यालयातील याप्रमाणे जिल्ह्यात सात पथक स्थापन करण्यात आले. दरम्यान, या पथकाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. अनेक ठिकाणी साठेबाजी असल्याचे या पथकाला आढळून आले. मात्र, त्यांच्याकडून कारवाईचा फार्स ठरला. दरम्यान प्रशासकीय कारभाराने त्रस्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विभागाचे सचिव दीपक कपूर यांना चांगलेच धारेवर धरून कारवाईचा अहवाल तातडीने मागून कामात पारदर्शकता आणण्याचे निर्देश दिले. ज्याठिकाणी काही अर्थपूर्ण व्यवहार झाले नाही, अशाठिकाणी या पथकाने व्यापाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रकारही समोर आले आहे. एकूणच या पथकांवर शासनाने हजारो रूपयांचा खर्च केला. कारवाईत एक किलोच्याही डाळीची साठेबाजी पथकाला आढळून आली नाही, हाच संशोधनाचा विषय आहे.धाडी टाकल्या मात्र कारवाई शून्यभंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी येथील काही व्यापारी डाळीची विक्री करण्यात पुढारले आहेत. लगतच्या मध्यप्रदेशातून जिल्ह्यात डाळ विक्रीसाठी आणली जाते. डाळीच्या किंमतीत वाढ झाल्याने दिवाळीचे महत्त्व ओळखून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी यात हात ओले केल्याने ‘आॅल इज वेल’ म्हणून हात वर केल्याची चर्चा आहे.