शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

ओबीसी ; सरकारने आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारप्रमाणे आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

२६ लोक ०२ के भंडारा : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष ...

२६ लोक ०२ के

भंडारा : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष मिळूनही यावर मार्ग काढू शकले नाही. मात्र, आतातरी महाविकास आघाडी सरकारने आंध्रप्रदेश व तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी मदत करावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे.

ओबीसी आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तत्काळ निर्णय घ्यावा कारण इम्पेरिकल डेटा उपलब्ध झाला नाही. आणि लगेच राज्यात पाच जिल्ह्यात पोटनिवडणुका लागल्या. महत्त्वाची बाब म्हणजे जर आंध्रप्रदेश व तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढला तर, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवून ठेवता येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पाच जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जाहीर केल्या. तत्काळ महाविकास आघाडी सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावून ओबीसी आरक्षणासाठी आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने डेटा दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ४ मार्च २०२१ च्या निकालाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले.

राज्य सरकारने न्यायालयात वेळेतच इम्पेरिकल डेटा सादर केला असता तर, ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहिले असते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व अति महत्त्वाकांक्षामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. ज्याप्रमाणे राज्य सरकार दोषी आहे. त्याचप्रमाणे त्यापेक्षा सर्वात मोठा दोष केंद्र सरकारचा आहे, असेही ओबीसी क्रांती मोर्चाने म्हटले आहे.