शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जिल्ह्यात रुग्णसंख्या शून्यावर; निर्बंध कधी शिथिल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या जवळजवळ शून्यावर आली आहे. जुलै महिन्यात केवळ २० पाॅझिटिव्ह ...

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या जवळजवळ शून्यावर आली आहे. जुलै महिन्यात केवळ २० पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. १५ दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नाही; तर ॲक्टिव रुग्णांची संख्या केवळ आठ आहे. अशी स्थिती असतानाही जिल्ह्यात मात्र निर्बंध कायम आहेत. सायंकाळी ४ वाजताच बाजारपेठ बंद होत असल्याने व्यापाऱ्यांसह लघुव्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. कोरोना रुग्णसंख्या शून्यावर येत असल्याने जिल्ह्याचे निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जून महिन्यापासूनच रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. जुलै महिन्यात तर पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या अगदी बोटावर मोजण्याएवढी आहे. १ ते २९ जुलै दरम्यान जिल्ह्यात सुमारे १८ हजार व्यक्तींची चाचणी केल्यानंतर केवळ २० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. १५ दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नव्हता. विशेष म्हणजे या २९ दिवसात कुणाचाही मृत्यू झाला नाही. जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून केवळ आठ ॲक्टिव रुग्ण आहेत. अशी स्थिती असतानाही कोरोना संसर्गाचे नियम मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत.

जिल्ह्यात सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंतच बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत आहे. ४ वाजता दुकान बंद होत असल्याने छोटे व्यावसायिक अनेक व्यापाऱ्यांवर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक तर या निर्बंधाने उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाॅटेल व्यवसाय खरे तर सायंकाळपासूनच सुरू होते. परंतु निर्बंध असल्यामुळे हा व्यवसायही जिल्ह्यात पूर्णत: बंद झाला आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी होत आहे. निर्बंध शिथिल होत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

बाॅक्स

नोकरांचे वेतन अन् कर्जाचे हप्ते थकले

भंडारा शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे; परंतु गत दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे दुकानात असलेल्या नोकरांना वेतन देणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत निर्बंध उठले नाही तर व्यापारी उद्ध्वस्त होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाॅक्स

बाजारपेठ बंद; नागरिक मात्र रस्त्यावर

कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यात सायंकाळी ४ वाजेनंतर अंशत: संचारबंदी आहे. व्यापारी आपली प्रतिष्ठाने वेळेवर ४ वाजता बंद करतात. दुकान बंद केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. दुसरीकडे नागरिक मात्र रात्री उशिरापर्यंत गर्दी करून असतात. कुणीही मास्क लावत नाही की फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही करीत नाही.

कोट

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. परंतु व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध कायम आहे. अर्थकारणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. लहान व्यापाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुकाने ४ वाजता बंद करण्याची अट शिथिल करावी, असे निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

-डाॅ.परिणय फुके, आमदार

कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणत्याही सूचना नाही. शासनाकडून तसा कोणताही प्रस्ताव मागविण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे निर्बंध कायम आहेत.

-संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा