शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

आता रिक्षाचालक - मालकांना मिळणार विमा, आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:54 IST

नियमावलीही प्रसिद्ध : विविध योजनांचा मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रिक्षाचालकांसाठी राज्य शासनाने कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. त्याअंतर्गत चालक- मालकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाने नियमावलीही प्रसिद्ध केली आहे.

शासनाच्या योजनेतून रिक्षाचालकांचे कल्याण होणार आहे. योजनेची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचणार आहे. या निर्णयाचे शहरातील रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी इतर रिक्षाचालक संघटनांची होती. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती. आतापर्यंत शासनाने काही वेळेस घोषणा केल्या. पण, अंमलबजावणी झाली नव्हती. रिक्षाचालकांची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली.

रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ रिक्षाचालकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवणे, मंडळाच्या कल्याणकारी निधीचे विनियोजन व व्यवस्थापन करणे, रिक्षा चालकांना सामजिक सुरक्षा देण्याची जबाबदारी या मंडळावर राहणार आहे.

असा मिळवा रिक्षाचालकांना लाभ

  • रिक्षाचालकांनी लाभासाठी जिल्हा कार्यालयांमध्ये विहीत नमुन्यात अर्ज करावा. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासला जाईल.
  • राज्यस्तरीय मंडळ व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार लाभ वितरित केले जातील. यामुळे रिक्षाचा- लकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान होणार आहे.

कल्याणकारी योजनांचा लाभ

  • शहरात कार्यरत रिक्षाचालकांना कल्याणकारी योजनांचा लाभ होणार आहे. प्रत्येक रिक्षाचालकाने आपली नोंदणी आपापल्या संघटनेकडे करून घ्यावी.
  • यापूर्वी संघटनांनी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. लवकरच या योजनांची अंमलबजावणी होणार असल्याने लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

३,००० रिक्षा चालक जिल्ह्यात कार्यरतभंडारा जिल्ह्यात सुमारे तीन हजारांहून अधिक रिक्षाचालक असून, या योजनेचा लाभ पात्र रिक्षाचालकांना मिळू शकणार आहे.

रिक्षाचालकांना काय मिळणार?

  • आरोग्य विमा : जीवनविमा व अपंगत्व विमा योजना तसेच आरोग्यविषयक लाभ मिळणार आहेत.
  • दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य : कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.
टॅग्स :bhandara-acभंडारा