शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

आता २४ तासांत वीज जोडणी

By admin | Updated: October 11, 2016 00:37 IST

नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया...

महावितरणचा उपक्रम : ग्राहकांची ताटकळत राहण्यापासून मुक्तीभंडारा : नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या यामध्ये राज्यभरातील महावितरणच्या ३६ मंडळांतर्गत ८८ विभागांच्या निवडक कार्यक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अँपद्वारे आता ग्राहक सेवेचा मापदंड निर्माण केला आहे. आतापर्यंत राज्यात जुलै २०१६ पासून म्हणजे अवघ्या दोन महिन्यात १,२२८ ग्राहकांना चोविस तासात वीज जोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेला गती मिळत असून ग्राहकांकडूनही अधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणकडून सांगण्यात येत आहे.ज्या भागात नवीन वीज जोडणीसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा भागातील तब्बल १५० पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात महावितरणकडून ग्राहकाला चोवीस तासांत नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार आहे. याबाबत सबंधित परिमंडळ, मंडळ, विभाग व उपविभाग, शाखा कार्यालय यांची नावे महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरगुती आणि वाणिज्यक वर्गवारीच्या सिंगल किंवा थ्रीफेजच्या नवीन वीज जोडणीसाठी सबंधित ग्राहकाची थकबाकी नसल्यास व दिलेल्या कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास चोवीस तासांत संबंधित ग्राहकाला वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन जोडणीसाठी इंटरनेटद्वारा महावितरणच्या संकेतस्थळामार्फत आणि अँपच्या माध्यमातून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. वीज जोडणी देण्याची संपूर्णअंतर्गत प्रक्रिया महावितरणने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आॅनलाईन करणे अनिवार्य केले आहे. तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीज जोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी अर्जप्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक व अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना या अँपद्वारा आता शक्य झाले आहे. ग्राहक आणि सबंधित कर्मचारी दोघांचेही काम अँपमुळे हलके झाले असून चोवीस तासात वीज जोडणी उपक्रमामध्ये अँप महत्वाची भूमिका बजावित आहे. या सुविधेमुळे ग्रामीण तथा शहरी भागातील नविन वीज जोडणीधारकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)नागरिकांचा वाचणार त्रास पूर्वी वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महिनोंमहिने वीज वितरणच्या कार्यालयात ग्राहकाला येरझारा माराव्या लागत होत्या. आता मात्र हा त्रास वाचणार आहे. परंतु यामध्ये काही अटी टाकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी वीजजोडणी देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा तयार आहेत. अशा परिसरातील वीज जोडणीचा आॅनलाईन अर्ज असल्यास चोविस तासात वीजजोडणी देण्यात येते. विनाकारण ग्राहकांची अडवणूक होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे. परंतु ज्या ठिकाणी वीज जोडणी देण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे, सर्विस लाईनच नाही, अशा ठिकाणी मात्र चोविस तासात वीज जोडणी देता येणे शक्य नसल्याने महावितरणने स्पष्ट केले आहे.