शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

आता २४ तासांत वीज जोडणी

By admin | Updated: October 11, 2016 00:37 IST

नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया...

महावितरणचा उपक्रम : ग्राहकांची ताटकळत राहण्यापासून मुक्तीभंडारा : नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अँपच्या सहाय्याने केवळ चोवीस तासात वीज जोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या यामध्ये राज्यभरातील महावितरणच्या ३६ मंडळांतर्गत ८८ विभागांच्या निवडक कार्यक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. महावितरणने विकसित केलेल्या मोबाईल अँपद्वारे आता ग्राहक सेवेचा मापदंड निर्माण केला आहे. आतापर्यंत राज्यात जुलै २०१६ पासून म्हणजे अवघ्या दोन महिन्यात १,२२८ ग्राहकांना चोविस तासात वीज जोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेला गती मिळत असून ग्राहकांकडूनही अधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणकडून सांगण्यात येत आहे.ज्या भागात नवीन वीज जोडणीसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा भागातील तब्बल १५० पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात महावितरणकडून ग्राहकाला चोवीस तासांत नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार आहे. याबाबत सबंधित परिमंडळ, मंडळ, विभाग व उपविभाग, शाखा कार्यालय यांची नावे महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरगुती आणि वाणिज्यक वर्गवारीच्या सिंगल किंवा थ्रीफेजच्या नवीन वीज जोडणीसाठी सबंधित ग्राहकाची थकबाकी नसल्यास व दिलेल्या कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास चोवीस तासांत संबंधित ग्राहकाला वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन जोडणीसाठी इंटरनेटद्वारा महावितरणच्या संकेतस्थळामार्फत आणि अँपच्या माध्यमातून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. वीज जोडणी देण्याची संपूर्णअंतर्गत प्रक्रिया महावितरणने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आॅनलाईन करणे अनिवार्य केले आहे. तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीज जोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अँपची निर्मिती केली आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी अर्जप्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक व अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना या अँपद्वारा आता शक्य झाले आहे. ग्राहक आणि सबंधित कर्मचारी दोघांचेही काम अँपमुळे हलके झाले असून चोवीस तासात वीज जोडणी उपक्रमामध्ये अँप महत्वाची भूमिका बजावित आहे. या सुविधेमुळे ग्रामीण तथा शहरी भागातील नविन वीज जोडणीधारकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)नागरिकांचा वाचणार त्रास पूर्वी वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महिनोंमहिने वीज वितरणच्या कार्यालयात ग्राहकाला येरझारा माराव्या लागत होत्या. आता मात्र हा त्रास वाचणार आहे. परंतु यामध्ये काही अटी टाकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी वीजजोडणी देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा तयार आहेत. अशा परिसरातील वीज जोडणीचा आॅनलाईन अर्ज असल्यास चोविस तासात वीजजोडणी देण्यात येते. विनाकारण ग्राहकांची अडवणूक होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे. परंतु ज्या ठिकाणी वीज जोडणी देण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे, सर्विस लाईनच नाही, अशा ठिकाणी मात्र चोविस तासात वीज जोडणी देता येणे शक्य नसल्याने महावितरणने स्पष्ट केले आहे.