शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

आता ग्रामीण भागात मंडईची रेलचेल

By admin | Updated: November 13, 2015 00:48 IST

दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण, झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी.

झाडीपट्टीतील नाटकांना पसंती : उत्सवामुळे कलावंताना मिळणार उत्पन्नभंडारा : दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण, झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. पाच दिवसांचा दिवाळी सण आटोपताच मंडई उत्सवाची धामधुम सुरू होणार आहे. परिणामी ग्रामीण भागात जत्रेचा माहोल दिसणार आहे.तसे बघितले तर दिवाळी उत्सवाची खरी मजा ही ग्रामीण भागात आयोजीत होणाऱ्या मंडई उत्सवाची असते. दिवाळी सण सुरु होताच ग्रामीण भागात मोठया प्रमाणात मंडईला सुरुवात होत असते. मंडई निमित्त नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त झाडीपट्टीतील नाटकांना म्हणजेच संचाच्या नाटकांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते. त्याचबरोबर तमाशा, दंडारी, आमदंगल आणि आंबट शौकीनासाठी हंगामे आयोजीत केले जातात. काही का असोना पण मंडई उत्सवामुळे कलावंताना त्यापासून मोठया प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असते. मंडईला डेकोरेशनची मागणी सुद्धा मोठया प्रमाणात असते. महिनाभरापासून डेकोरशन बुक केले जात असते. मंडईला पाहुण्याचे आदान - प्रदान होत असते. नातलग एकमेकांच्या गावी मंडईनिमित्त का होईना पण भेटीगाठी घेत असतात. लहान मुलापासून तर तरुण, मोठयांना मंडईचे खास आकर्षण दिसून येते. विशेष करुन तरुण मुला - मुलींना मंडई उत्सव मोठी पर्वणीच घेऊ न येणारा ठरतो. मंडई उत्सव तरुण- मुला - मुलीसाठी भावी जोडीदाराची निवड करण्याचे एक केंद्रस्थान सुद्धा मंडईला ग्रामीण भागात विशेष असे महत्व दिसून येते. दिवाळी सण सर्वासाठी आनंदाचे, उत्सवाचे आणि हर्षोल्लास घेऊ न येणारा सण असतो. आणि त्यात मंडई उत्सव ग्रामीण नागरिकांसाठी आनंदाचे पर्वणीच घेणारा ठरत असतो. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या या मंडई उत्सवाची मजा काही वेगळीच असते हे मात्र विशेष.ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्व असते. सकाळ सत्रापासूनच आप्तस्वकीयांचे येणे-जाणे सुरू होते. विशेष म्हणजे सोयरकीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. दिवाळीचा फटाका फुटताच सुयोग्य वर-वधू यांच्या लग्नाचा बार उडविण्याचा बेत आखला जातो. त्यात मंडईच्या बहाण्याने भेटी-गाठी वाढविण्यावर भर दिला जातो. त्यातूनच मोठ्या प्रमाणात संबंध वाढीला लागतात. दरम्यान या उत्सवाच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल सुद्धा होत असते. (प्रतिनिधी)