शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

आता नववीच्या विद्यार्थ्यांचेही मूल्यमापन

By admin | Updated: September 22, 2016 00:36 IST

राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांच्या गळतीला घेऊन चर्चेअंती सदर प्रमाण कमी करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या ...

दहावीच्या मूल्यमापनाची पद्धती अवलंबिणार : वस्तूनिष्ट अभ्यासक्रमावर दिले जाणार लक्षभंडारा : राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांच्या गळतीला घेऊन चर्चेअंती सदर प्रमाण कमी करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक स्तरावरही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्या अंतर्गत यावर्षीपासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचेही मूल्यमापन केले जाणार आहे. माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विविध बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. चर्चेत काही शाळा फक्त दहावीत शंभर टक्के निकाल दाखविण्याच्या हेतूने कमी बुद्धीमत्ता असलेल्या इयत्ता नववीत त्या मुलांना मुद्दामहून नापास करतात. काही शाळांमध्ये दहाव्या इयत्तेत नववी कक्षा कमी तुकड्या मंजूर असल्याने त्या शाळांमधील मुलांना नवव्या इयत्तेत नापास करावे लागते. अशी बाबही समोर आली आहे. आठवी इयत्तापर्यंत नापास न करण्याचे धोरण असल्यामुळे बुद्ध्यांक कमी असलेली मुली नवव्या इयत्तेत पोहचतात व ती नापास होतात असेही निदर्शनास आले आहे.मुलांचे नापास होण्याचे कारण कुठलेही असो, मात्र नवव्या इयत्तेनंतर गळतीचे प्रमाण मोठे असल्याचे आकड्यावरून दिसून आले आहे. सन २०१३-१४ मध्ये नवव्या इयत्तेत नापास मुलांची संख्या राज्यात २ लक्ष ५९ हजार, १४-१५ मध्ये २ लक्ष ४५ हजार इतकी होती. याशिवाय दहावीपरीक्षेत बसल्यानंतर नापास होणाऱ्या मुलांची संख्या सन २०१३-१४ मध्ये १ लक्ष ५१ हजार ६९१ होती. तर २०१४-१५ मध्ये १ लक्ष ३८ हजार २६१ इतकी होती. परिणामी सर्व मुले वेळच्या वेळी पास झाली असती तर सन २०१३-१४ मध्ये २ लक्ष ५९ हजार तर सन २०१४-१५ मध्ये २ लक्ष ४५ हजार मुलांची गळती रोखता आली असती. (प्रतिनिधी)अशी आहे मूल्यमापन योजनाइयत्ता नववी व दहावीच्या अभ्यासक्रमाची मूल्यमापनाची योजना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत निश्चित केली जाते. इयत्ता दहावीसाठी जी मूल्यमापन योजना आहे तीच इयत्ता नववीसाठी लागू आहे. ज्या विषयांचे अथवा विषयाच्या काही अंशाचे मूल्यमापन अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने होते त्या बाबत ते वस्तूनिष्ट करण्याची जबाबदारी शाळा प्रमुख व शिक्षकांच्या खांद्यावर आहे. यासोबतच तोंडी परीक्षा अथवा प्रात्यक्षिक परीक्षेचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. तसेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये असलेली परीक्षेची भितीही कमी करण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. राज्यात जवळपास १५ हजार शाळा डिजीटल झाल्याची माहिती आहे. माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्याचा हाती घेण्यात आला आहे. या आशयाचे शासन निर्णयही निर्गमीत झाले असून ते आदेश प्राप्त झाले आहे. निर्देशाप्रमाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल.- अभयसिंह परिहारप्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारा